जिल्हा बँकेसाठी सहकार पॅनेल विरुध्द अपक्ष अशी 10 जागांसाठी 20 जणांमध्ये आज मतदानाची प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यात 11 मतदान केंद्रावर सायंकाळी 5 वाजेपर्यंत 1964 पैकी 1892 मतदारांनी मतदानांचा हक्क बजावल्याने 96.33 टक्के मतदान झाले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस वाढावी यासाठी मी सातत्याने प्रयत्न करीत असतो. सातारा जिल्ह्यात देखील राष्ट्रवादीच्या मजबूतीसाठी माझे प्रयत्न सुरु असतात. त्यातून कोणाच्या भावना दुखवल्या जात असतील तर माझा नाईलाज आहे.
नाशिक पोलीस आयुक्त व अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून राज्यातील अति महत्वाच्या पदावर कामकाजाचा ठसा उमटवणाऱ्या प्रकाश पवार यांचा अतिशय शिस्तप्रिय व जबाबदार अधिकारी म्हणून महाराष्ट्रामध्ये नावलौकीक होता. त्यांनी पोलीस अधीक्षक म्हणून सोलापूर, अहमदनगर, रायगड, पुणे ग्रामीण येथे विशेष काम केले आहे.
तालुक्यातील उमेदवार शशिकांत शिंदे आणि ज्ञानदेव रांजणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मेढा येथे वाद झाला. मतदान केंद्रावर वाद झाल्यानं या ठिकाणी काहीवेळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, या ठिकाणी दोन्ही कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने तणाव कायम आहे.
वारूंजी, ता. येथे खासगी व्यवहारातून आर्किटेक्टला मारहाण झाल्याप्रकरणी शनिवारी 20 रोजी सात जणांना अटक करण्यात आली. सायंकाळी त्यांना न्यायालयात हजर केले असता जामीन मंजूर झाला. याप्रकरणात नितीन छाजेड यांना कोणतीही मारहाण झालेली नाही.
प्रफुल्लकुमार भीमराव सरगडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, गोडोली येथील विजय साई प्राईडमध्ये त्यांच्या फ्लॅट असून गुरुवारी सकाळी आठ ते दुपारी सव्वातीन वाजण्याच्या दरम्यान, चोरट्यांनी तो फोडला आणि येथून ३७ हजारांचा ऐवज चोरीला गेला.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील सर्वाधिक हॉट झालेल्या ‘जावली प्राथमिक कृषी पतपुरवठा’ मतदारसंघाची निवडणूक राष्ट्रवादीचे नेते आ. शशिकांत शिंदे यांना सोपी करण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांचे प्रयत्न अखेर अयशस्वी ठरले. ‘बाबा तुमच्यासाठी काहीही करु; पण आता माघार घेणार नाही.
केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्यमंत्रालयाद्वारे घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण आणि कचरामुक्त शहरे या सर्वेक्षणात सातारा पालिकेचा शनिवारी दिल्ली येथील विज्ञान भवनामध्ये आयोजित कार्यक्रमात गौरव झाला. केंद्रीय गृहनिर्माण विभागाचे मुख्य सचिव दुर्गशंकर मिश्रा यांच्या हस्ते पालिकेचे उपनगराध्यक्ष मनोज शेंडे व मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी कचरामुक्त शहराचा विशेप सन्मान स्वीकारला.
जावली तालुक्यातील भुतेघर गावच्या वन हद्दीत बिबट्याने केलेल्या हल्ल्यात खिलारखोंडाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार दि.१९ रोजी घडली. परिसरात बिबट्याचा वावर वाढल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मराठ्यांची राजधानी असलेल्या साताऱ्यातल्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहलायाची नवीन वास्तू सुसज्ज अशी आहे. त्याच इमारतीत हे संग्रहालय सुरु व्हावे. अशी मनोमन इच्छा आम्हा शिवभक्तांची आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी लवकरात लवकर नव्या इमारतीचे हस्तांतरण करावे, जेणेकरुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या या संग्रहालयाला चांगले दिवस येतील.