महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाकडून केलेल्या अन्वेषणात मुंबई येथून अत्ताउल्हा मोहम्मद नईम चौधरी या व्यक्तीस अटक करण्यात आली असल्याची माहिती राज्यकर उपआयुक्त (जनसंपर्क) यांनी दिली आहे.
मतदारांची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध केली असून या मतदार यादीत आपले नाव असल्याचे नागरिकांनी खात्री करुन घ्यावी. तसेच व्होटर हेल्पलाईन या ॲपचा वापर करुन युवकांनी मतदार यादित नाव येण्यासाठी ॲपवर नाव नोंदणी करावी व मतदान प्रक्रियेत जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) परीक्षेची आवेदनपत्रे गुरूवार दि. 18 नोव्हेंबरपासून स्वीकारली जाणार आहेत.
लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक दौलतनगर (मरळी) येथे उभारण्यात आलेल्या ध्वजस्तंभ आणि ध्वजाचे लोकार्पण नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभुराज देसाई याची प्रमुख उपस्थिती होती.
साताऱ्यातील मेढा एसटी डेपोतील कर्मचाऱ्याचा मागील दहा दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असताना अनेक ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले आहेत. असे असतानाच सातारा जिल्ह्यातील मेढा एसटी डेपोतील कर्मचाऱ्यांचा ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.
नॅशनल फेडरेशन न्यू दिल्ली, या राष्ट्रीय स्तरावरील केंद्रीय शिखर संस्थेकडून अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यास जाहीर झालेला 'हायस्ट शुगर रिकव्हरी इन हाय रिकव्हरी एरीया' इफिशियन्सी पुरस्कार माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, राज्याचे गृहमंत्री ना. दिलीप वळसे- पाटील, आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे, हर्षवर्धन पाटील, संस्थेचे पदाधिकारी आदी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
सातारा जिल्हा पोलीस दलातील निलेश गौतम बच्छाव (रा. बसापा पेठ, सातारा) या अवघ्या २९ वर्षीय पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. काल पीटी परेड झाल्यानंतर त्यांना छातीत दुखू लागल्याने खासगी रुग्णालामध्ये दाखल करण्यात आले होते.
नगरसेवक सुहास जगताप यांच्या कल्पनेतून सोमवार पेठेतील 15 धोकादायक चौकांमध्ये कॉनव्हॅक्स मिरर (बर्हिवर्क आरसे) बसवण्यात आले आहेत. या कॉनव्हॅक्स मिररमुळे अंतर्गत रस्त्यावरील धोकादायक चौक व वळणावर होण्याऱ्या अपघातांना आळा बसणार असून त्यांच्या या संकल्पनेचे सोमवार पेठेसह शहरातील नागरिकांमधून कौतुक होत आहे.
कोरोना संसर्गामुळे दोन्ही पालक गमावलेल्या 0 ते 18 वयोगटातील बालकांना "अर्थसहाय्य योजना" या योजनेंतर्गत कोविड कालावधीत कोविड संसर्गामुळे ज्या बालकांचे दोन्ही पालक (आई व वडील) हे मृत्यू पावलेले आहेत, अशा बालकाच्या नावे एकरकमी पाच लाख रुपये रक्कम मुदत ठेव म्हणून जमा करण्याची ही योजना आहे. या योजनेंतर्गत ही एकरकमी मुदत ठेव रक्कम संबंधित बालक व जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांच्या नावे असणाऱ्या सामायिक बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे.
कराड तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध भागात वारंवार बिबट्याचे हल्ले होत आहेत. येणके येथे नुकतेच बिबट्याच्या हल्ल्यात ऊसतोड मजुरांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. त्यामुळे जिल्ह्याचे वन अधिकारी एससी ऑफीसमध्ये झोपा काढतात का?