जावली तालुक्यातील प्रतापगड साखर कारखान्याचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून दि. 13 मार्च रोजी मतदान होणार आहे. तर दि. 14 मार्चला मतमोजणी केली जाणार आहे. या निवडणूक कार्यक्रमामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे.
देगाव फाटा ते औद्योगिक वसाहती कडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डयांचे साम्राज्य निर्माण झाले असून हा रस्ता खड्डयात गेला आहे. या मतदारसंघाला दोन-दोन लोकप्रतिनिधी लाभूनही वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन या रस्त्यावरून वाहने चालवावी लागत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग व औद्योगिक वसाहत कार्यालय रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे वाहनचालकांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर उमटत आहे.
दहिवडी नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी सर्वच पक्षातून इच्छुक उमेदवारांचे मोठ्या पातळीवर प्रयत्न सुरू असतानाच राष्ट्रवादीचे नगरसेवक महेश जाधव यांनी ऐनवेळी बंडखोरीचे निशान उभारल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात शुकशुकाट पसरला आहे.
वारकरी सांप्रदायाला मोठी संत परंपरा आहे. या परंपरेने जाती व्यवस्था मोडून काढून खऱ्या अर्थाने भागवत धर्माची पताका उंचावली आहे. त्याच वारकरी सांप्रदायात काम करताना प्रबोधनाची भूमिका मांडणाऱ्या हभप बंडातात्या कराडकर यांनी वार्इन विक्रीला विरोध करताना ज्या पध्दतीने महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये केली आहेत ती अंत्यत चुकीची आहे.
गेल्या काही दिवसांपासून एसटी बसेसवर होत असलेली दगडफेक पाहता खबरदारीचा उपाय म्हणून एसटी बसेसच्या काचांना आज लोखंडी जाळ्या बसविण्यात आल्या.
राजकारणाच्या मैदानात अल्पावधीतच चुणूक दाखवून जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी अशक्यप्राय विजय मिळवून इतिहास घडवला होता. क्रिकेटच्या मैदानातही केवळ २ चेंडूत एका षटकारासह ६ धावा काढून आपल्या आंबेघर संघाला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.
नांदगाव, ता. कराड येथे बिबट्याचा वावर वाढला आहे. रविवारी ६ रोजी रात्री गावातील एसटी स्टँड परिसरात बिबट्या रस्त्यावरून फिरताना सीसीटीव्हीत कैद झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्यामध्ये घाबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वन विभागाने तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
जावळी तालुक्याचे ठिकाण असलेल्या मेढ्यात खुलेआम दारू विक्री सुरू आहे. याबाबत कोणीही आवाज उठवत नसल्याने अखेर चक्क एका महिलेने देशी दारू पकडून दिली. यामुळे महिलेने पोलिसांची नशा उतरवली, अशी चर्चा सुरू झाली आहे.
वडाचे म्हसवे, ता. जावली येथील सावंत कुटुंबीयांना काल रात्री पोलिसांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
स्वरसम्राज्ञी भारत रत्न लता मंगेशकर यांना आज साताऱ्यातील रंगकर्मींकडून शब्दसूरांची आदरांजली वाहण्यात आली.