सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी 2021-22 मध्ये सर्व शासकीय नियम धाब्यावर बसवून गाळप हंगामात गेलेल्या गैर कारभाराविरुद्ध चौकशी करून तात्काळ त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.
राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या ‘किसनवीर’ सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निकालात आ. मकरंद पाटील यांच्या शेतकरी बचाव पॅनेलने मुसंडी मारली असुन सर्वच्या सर्व 21 जागांवर तब्ब्ल तीन हजारच्या वर मताधिक्याने मोठा व दणदणीत विजयी मिळवत पंधरा वर्षांची मदन भोसले यांची सत्ता उलथवून टाकली आहे.
एकाचा धारदार शस्त्राने खून करून मृतदेह कॅनॉलमध्ये फेकून देण्यात आला होता. ही घटना मंगळवारी रात्री फरासवाडी ता. सातारा येथे उशिरा उघडकीस आली होती. या गुन्ह्याचा कौशल्याने तपास करुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आणि तालुका पोलिसांनी 12 तासांच्या आत या खुनाची उकल केली आहे.
सातारा-मेढा मार्गावर असलेल्या नुने येथे दुचाकी व चारचाकीच्या अपघातात 9 वर्षाच्या चिमुकल्यासह त्याच्या वडिलांचा जागीच मृत्यू झाला. तर चारचाकी गाडीतील एक युवक गंभीर जखमी झाला आहे. अपघातातील मृत बाप-लेक हे कण्हेर येथील आहेत.
मालदेववाडी, ता. वाई येथील बंद घरात घरफोडी करून अज्ञात चोरट्याने ६२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची तक्रार भुईंज पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
पुणे ते बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील तासवडे व किणी टोल नाक्यांवरील टोल वसुलीची मुदत संपुष्टात येत असल्याने आतातरी 'टोळधाड' थांबेल अशी वाहनधारकांमध्ये निर्माण झालेली आशा अखेर फोल ठरली आहे. या टोल नाक्यांच्या टोल वसुलीला २५ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
सातारा जिल्हा शांतताप्रिय असून आज दिवसभरात जिल्ह्यात कोणतीही अनुचित घटना घडली नाही. ज्यांना अशांतता निर्माण करण्याचे काम करायचे होते त्यात त्यांना यश आले नाही अशी माहिती गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली.
श्री.छ.सौ. चंद्रलेखाराजे भोसले यांच्या जयंतीचे औचित्य साधून श्री.छ.प्रतापसिंह महाराज सेवाधाम आणि सातारा रंगकर्मी यांच्यावतीने हास्यतारा या राज्यस्तरीय लघुनाटिका (स्कीट) स्पर्धेचे आयोजन शाहूकलामंदिर येथे करण्यात आले होते. या स्पर्धेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत 21 संघांनी सहभाग घेतला.
सर्वोच्च न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारला ओबीसी आरक्षणावरून मोठा धक्का दिला आहे. राज्य सरकारने या संदर्भात केलेला कायदा फेटाळून लावत 15 दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून राज्य निवडणूक आयोगाला देण्यात आला आहे. सवोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयामुळे आता ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.
फलटण तालुक्यातील सुरवडी येथील फलटण- लोणंद मार्गावर जगतापवस्ती नजीक झालेल्या भीषण अपघातात 2 जण जागीच ठार झाले आहेत, तर १0 जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे.