अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी तिघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
वृद्धेच्या घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर सातारा शहर पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे.
सातारा शहरात चोरट्यांकडून महिला टार्गेट होत असल्याचे वारंवार समोर येत आहे. वॉकींग करत असलेल्या महिलेचा मोबाईल व त्याच्या कव्हरमध्ये असलेली रक्कम चोरट्यांनी जबरदस्तीने चोरुन नेली असून सलग घटना घडत असल्याने महिलांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी अभिनेत्री गजानन खंडागळे (वय 38, रा. सातारा) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना पाच दरोडेखोर औंध पोलिस स्टेशनचे लॉकअप सोडून पळाले होते. या प्रकरणातली कर्तव्य कसूरी संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांना भोवली आहे. पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे यांच्यासह चार पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी निलंबित केले आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला 2021- 22 या आर्थिक वर्षाअखेर 138 कोटी 17 लाख रुपयांचा करोत्तर नफा झाला आहे. बँकेचा निव्वळ नफा हा 67 कोटी रुपये असून राखीव निधीसाठी 20 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
प्रज्ञा-शील-करुणा म्हणजे बुद्ध मार्ग होय. या मार्गावर जाण्यासाठी मनाची एकाग्रता व मशागत करावी लागते. त्यामुळे बुद्ध की और जाण्यासाठी तयार झालेल्या महाराष्ट्रातील २८ माता-भगिनींनी चक्क श्रामणेरी दिक्षा घेऊन आपली मनोकामना पूर्ण केली आहे. त्यामध्ये सायगाव ता जावळी जि सातारा येथील श्रामणेरी सुजाता तथा सौ वंदना अरुण जगताप यांचा समावेश आहे.
शिवसमर्थांच्या ऐतिहासिक भेटीचे महत्त्वाचे ठिकाण शिंगणवाडी हेच असल्याने, याच चाफळ खोऱ्यातून शिवाजी महाराजांचे विचार देशभर पोहोचविले जाण्याचा व मनामनात रुजविण्यासाठी कार्य करण्याचा आग्रह गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी व्यक्त केला. वैशाख शुद्ध नवमीला शिंगणवाडीत शिवसमर्थ प्रेरणादिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
सातारा शहराजवळ असलेल्या अंजिक्यतारा किल्ल्याला पुरातन इतिहास आहे, परंतु काळाच्या ओघात त्याच्याकडे दुर्लक्ष झाले आहे. हा किल्ला पुरातत्व विभागाच्या राज्य संरक्षित किल्ल्यामध्ये येत नसल्यामुळे दुर्लक्षित झाला आहे व त्यामुळे त्याचे संवर्धन होत नाही, तरी हा किल्ला राज्यसंरक्षित किल्ला म्हणून घोषित करावा
माण-खटावचे विद्यमान भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्यासह त्यांची पत्नी सोनिया गोरे, अरुण गोरे, शैलजा साळुंखे, स्मिता कदम व महंमद फारुख खान यांच्यावर विविध कलमान्वये वडूज येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. गेल्या महिनाभरातील भाजपा आमदार यांच्यावर फसवणुकीचा दुसरा गुन्हा दाखल झाल्याने जिल्ह्यात खळबळ झाली आहे.
बुध (करंजओढा), ता. खटाव गावच्या हद्दीत चावर नावाच्या शिवारात अरविंद शंकर बोराटे (वय ५५, रा बुध [करंजओढा]) यांच्या शिवारातील दोन कांदयाच्या ऐरणीस रात्री लागलेल्या आगीत कांद्याची ऐरण जळून खाक झाली.