शिवसेनेचे नगर विकास मंत्री व सातारा जिल्ह्याचे सुपुत्र एकनाथ शिंदे 17 आमदारांसह नॉट रिचेबल झाल्याने मुंबईमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. या भूकंपामध्ये गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई, कोरेगावचे आमदार महेश शिंदे हे दोघे आऊट ऑफ कव्हरेज गेल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.
दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी एका महिलेवर शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
रिक्षाला पाठीमागून झायलो गाडी ने धडक देऊन अपघातात रिक्षाचालकाला जखमी केल्याप्रकरणी झायलो चालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
गोडोली, ता. सातारा येथे दारूच्या नशेत एकाला मारहाण करून धमकी दिल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा जिल्ह्यातून तिन वेगळ्या ठिकाणावरुन तिन जण बेपत्ता झाल्याची तक्रार संबंधित पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
लोणंद, ता. सातारा येथील शेतीला वीज जोडणीसाठी वीज वितरण कंपनीच्या कनिष्ठ अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बारा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. शरद ओंकेश्वर ओंकार, मुळ रा. लोणसावळे, ता. वर्धा, सध्या रा. लोणंद, ता. खंडाळा असे त्यांचे नाव आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमलात आणलेल्या स्टॅन्ड अप इंडिया या योजनेचा लाभ, मिळावा यासाठी भीमशक्ती सामाजिक संघटनेने आज सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवीण दाराबाहेर आंदोलन करून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना निवेदन दिले.
समाजातील सर्व महिला या गांभीर्याने काम करतात, आपल्याला दिलेले काम करताना त्या कामाची कोणतीही तक्रार करत नाहीत, असे प्रतिपादन शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर च्या सुमती लांडे यांनी केले.
सातारा शहराच्या पूर्वेला गोडोली परिसरात असणाऱ्या गोडोली तलावाच्या सुशोभीकरणासाठी केंद्र शासनाच्या अमृत-2 योजनेतून तब्बल साडेचार कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे. केंद्रीय जलशक्ति मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी या प्रस्तावाला तत्त्वतः मंजुरी दिली आहे. या निधीमधून तलावासाठी विविध सुविधा दिल्या जाणार आहेत.
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या विधानपरिषद निवडणुकीचा निकाल अखेर समोर आला आहे. दोन तासांच्या विलंबानंतर विधान परिषदेच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या फेरीचा निकाल हाती आला. यामध्ये भाजपचे सर्वच्या सर्व 5 उमेदवार विजयी झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे 2, शिवसेनेचे 2 आणि काँग्रेसचा एक उमेदवार विजयी झाले आहेत.