जर नागरिकांना आणि त्यांच्या कामांना वेळ दिला जात नसेल तर अंर्तगत खदखद वाढणारच. या मतभेदांची कुणकूण कानावर होतीच. राज्यातील महाविकास आघाडीचे पतन झाले, यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही, अशी थेट प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले यांनी दिल्लीवरून दिली आहे.
सातारा शहरांमध्ये वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये दहशत माजविणाऱ्या शुभम विनोद कांबळे (वय 26, रा. 263 बुधवार पेठ, सातारा) याच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा न्यायदंडाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत.
गाडीला ओव्हरटेक केला म्हणून तिघांना दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना यवतेश्वर गावच्या हद्दीत घडली आहे. ही घटना दिनांक 20 जून रोजी सायंकाळी साडेसातच्या दरम्यान घडली. याप्रकरणी शुभम दिलीप गायकवाड यांनी फिर्याद दिली असून ओंकार नलवडे शुभम पवार आणि इतर अनोळखी तीन मुलांवर शाहुपुरी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पुसेगाव-खटाव राज्य महामार्गावरील पुसेगाव हद्दीतील पुलाच्या कामासाठी उभ्या असलेल्या पोकलँड मशीन ला दुचाकीची धडक बसून खटाव येथील युवकाचा जागीच मृत्यू झाला. महेश दशरथ चव्हाण (वय 29) असे या मृत तरुणाचे नाव आहे, तर कपिल राजेंद्र गुंजवटे हे जखमी झाले असून त्यांच्यावर सातारा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत
येत्या आषाढीच्या मुहूर्तावर विठ्ठलाची पूजा करण्यासाठी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस पंढरपूरला जातील, असे भाकित सातारा भाजपचे जिल्हाध्यक्ष व माण विधानसभा मतदार संघाचे आमदार जयकुमार गोरे यांनी साताऱ्यात केले आहे.
शिवसेना नेते व मंत्री एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांना सोबत घेऊन बंड पुकारल्याने महाविकास आघाडीत शिवसेनेची अडचण झाली आहे. शिवसेनेत दोन गट पडले आहेत. ठाकरे सरकार अस्थिर होण्याच्या मार्गावर आहे.
डिस्कळ येथील श्री शिवाजी विद्यालयात प्राणायाम, योगासनांच्या प्रात्यक्षिकासह आरोग्यपूर्ण प्रशिक्षणाने आज जागतिक योग दिन साजरा करण्यात आला.
भारतीय जनता पार्टीची सातारा शहर, सातारा ग्रामीण, जावळी, कोरेगाव या चार मंडळांमधील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली, वेदभवन मंगल कार्यालय, सातारा या ठिकाणी संपन्न झाली.
खंबाटकी बोगद्यात जमिनी गेलेल्या वेळे, वाण्याचीवाडी, खंडाळा या तीन गावांतील शेतकर्यांच्या समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी आपण केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करणार असून प्रकल्पग्रस्त शेतकर्यांच्या पाठीशी कायम राहणार असल्याचा शब्द खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी प्रकल्पग्रस्तांसमवेत झालेल्या बैठकीत दिला.