मानवता हीच ईश्वर सेवा, या उक्तीचा तंतोतंत अनुभव म्हणजे, सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील वेळे गावच्या हाद्दीतील ’यशोधन अनाथ आश्रम’ रवि बोडके या फलटण तालुक्यातील माणुसकीच्या हट्टासाठी झपाटलेल्या माणसाचे तरुणाईतील कर्तृत्व भारारून टाकणारे आहे.
उद्योजक आणि शिवसेना नेते पुरुषोत्तम जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला जाहीर पाठिंबा दर्शवत शिंदे गटात प्रवेश केला. या निमित्ताने सातारा जिल्ह्यातील शिवसेनेला सुरुंग लागल्याचे मानण्यात येते.
गुरुवारी दुपारी पोवई नाक्यावरील शिक्षक बँकेसमोर दोन युवक पोलिसाच्या अंगावर धावून गेल्याने तणाव निर्माण झाला. यावेळी संतप्त झालेल्या काही नागरिकांनी युवकांना चोप दिला. युवकांनी मद्यप्राशन केल्याचे समोर आले असून रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
गजवडी फाट्याजवळ भरधाव वेगाने येणार्या ट्रॅव्हल्सने दुचाकीला दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाला असून एकजण जखमी झाला आहे.
राजवाडा येथील नगर वाचनालय परिसरात गुरुवारी सकाळी मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती पसरल्यानंतर शाहूपुरी पोलिसांना सांगण्यात आले.
"स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षा निमित्त" 11 ऑगस्ट 2022 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत प्रत्येकांच्या घरावर, शासकीय कार्यालयांवर तिरंगा झंडा फडकेल. या हर घर झंडा उपक्रमात जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
खटाव तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या बुध ग्राम पंचायतीच्या वतीने बुध स्टॅण्ड परिसर, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, स्मशानभूमी तसेच ईदगाह शाळा व परिसरात २५० झाडे लावून वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला.
इंद्रधनु विचारमंच फौंडेशनने टेंभू येथे आगरकरांच्या नावे पुरस्काराचा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. या प्रेरणादायी उपक्रमामुळे गुणवंत पत्रकारांबरोबरच टेंभू हे प्रबोधनाचे ज्ञानतीर्थ म्हणून गौरवले जाईल, असा विश्वास ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी व्यक्त केला.
भारतीय दलीत पँथरपासून कार्यरत असलेले फलटण येथील लढाऊ पँथर चंद्रकांत अहिवळे यांचे अल्पशा आजाराने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सातारा येथे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण आंबेडकरी समाजात दुःख व्यक्त केले जात आहे.
राज्य निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने 92 नगरपरिषदांच्या आणि चार नगपंचायतींच्या निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुका पुढच्या महिन्यात भर पावसात नियोजित करण्यात आलेल्या होत्या. त्यामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात, अशी सर्वपक्षीय मागणी होती.