पश्चिम महाराष्ट्रातील दीड लाख गिरणी कामगारांचे मुंबईमध्ये पुनर्वसन होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक लाख सह्यांचे निवेदन पाठवणार असल्याची माहिती श्रमिक संघटना व क्रांतिवीर भगतसिंग ब्रिगेड च्या वतीने अतुल दिघे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सातारा तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या मारहाणीच्या घटनेत चौघांवर संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
क्षेत्रमाहुली, ता. सातारा येथील कृष्णा नदीत पाय घसरून पाण्यात पडून बुडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.
सातारा येथील प्रस्तावित मेडिकल कॉलेज साठी भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा प्रकल्प मोठा असल्यामुळे त्यामध्ये काय- काय अंतर्भूत करायचे आहे. यामध्ये वेळ गेल्यामुळे हे काम रेंगाळले होते.
किसनवीर कारखाना संचालित खंडाळा सहकारी साखर कारखान्यात किसनवीर साखर कारखान्याचे तत्कालीन चेअरमन मदन भोसले यांच्या कार्यकाळात ६० ते ६५ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप किसनवीर कारखान्याचे नूतन संचालक नितीन पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.
यावेळी सातारा कास रस्त्यावर असलेल्या गणेश खिंड परिसरातील पठारावर पर्यटकांना गाड्या पार्किंग करुन पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून पुरविण्यात येणार्या इलेक्ट्रिक बस ची पर्यटकांना मोफत बस सेवा सुरु करण्यासंदर्भात पाहणी दौरा झाला याबरोबर बामणोली परिसराकडे जाण्यासाठी घाटाई मार्ग रस्ता खुला करण्याची माहिती दिली. यावेळी कास पठारावर कामी होणारे फुलांचे प्रमाण याबाबतची जिल्हाधिकार्यांनी गांर्भियाने दखल घेवून त्यावर लवकरात लवकर उपाय योजना करण्याचे आदेश वनविभाग व कास संवर्धन समितीस दिला. लवकरच इलेक्ट्रिक बसची सेवा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी ‘साहस वार्ता’ शी बोलतांना सांगितले.
अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञातावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
आईने घरकाम करण्यास सांगितले म्हणून मुलीने आत्महत्या केल्याची खबर सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
सर्पदंशाने एकाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
लक्ष्मण बाबुराव माने (वय ६०) हे आपल्या शेताची राखण करत असताना त्यांच्यावर गव्याने हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर सातारा येथील जिल्हा रुग्णालय व खाजगी रुग्णालयात उपचार झाले. प्रचलित शासन नियमाप्रमाणे लक्ष्मण बाबुराव माने यांना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडून एक लाख पंचवीस हजार रुपयांचा धनादेश वनक्षेत्रपाल बाळकृष्ण हसबनीस यांच्या हस्ते देण्यात आला.