राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र मध्ये तहसीलदार, प्रांत, जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात निवेदन देऊन कांदा उत्पादक शेतकर्यांच्या मालाला हमीभाव देण्याची मागणी करण्यात आली.
सर्वसामान्यांचा विचार न करता प्रत्येक ठिकाणी आपल्याच घरातील लोकांनाच पद, उमेदवारी देऊन तालुक्यावर हुकूमशाही लादली जात असल्याचा टोला माढा लोकसभा खासदार रणजितदादा नाईक-निंबाळकर यांनी मिस्टर रामराजे यांना लगावला.
सत्तेत राहण्यासाठी हे विकृत लोक पाहिजे ते बरळत आहेत. त्यांचे हे विधान म्हणजे राजकीय स्वार्थाचे विधान आहे. प्रत्येकवेळी काही नसलं की राजघराण्यावर बोलायचं. ज्या घराण्यामुळे तुमचा पक्ष उभा आहे, त्यांच्याविषयी बोलताना थोडी तरी लाज राखा, असा खोचक टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी संजय राऊत यांना लगावला.
सातारा : शिवसेना आज चक्रव्युहात सापडली असे कुणाला वाटत असेल तर ते मूर्ख आहेत. अशा अनेक सकटातून, चक्रव्युहातून कोडी फोडून शिवसेना बाहेर पडली आहे. गेल्या पन्नास वर्षात शिवसेनेने असे असंख्य धाव झेलले आहेत यापुढेही समोरून वार केलेत तर समोरून लढू आणि पाठीमागून खजीर खुपसणार असाल, तर त्याच पध्दतीने पाठीमागे वळून तुमचा कोथळा काढू असा जबरदस्त घणाघात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्...
शिक्षण विभागातर्फे शाळेच्या करण्यात आलेल्या वार्षीक तपासणीसाठीच्या खर्चापोटी 1875 रुपये मागून त्याची लाच स्वीकारल्याप्रकरणी उंब्रज येथील दोन्ही शिक्षकांना अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्यांना जामीन झाला असून दर सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात (एसीबी) हजेरी लावण्याचे आदेश करण्यात आले आहे.
महामार्गावरील सातारा शहरालगत वाढे फाटा येथे शुक्रवारी दुपारी एसटी व ट्रकचा अपघात झाला असून यामध्ये एकजण जखमी झाला आहे. अपघातानंतर वाहतुक ठप्प झाली. मात्र ट्रॅफिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेवून जखमीला उपचारासाठी रुग्णलयात पाठवून वाहतुक सुरळीत केली.
गडकर आळीत घरफोडी करुन अज्ञात चोरट्याने रोख 55000 हजार रुपयांच्या रकमेवर डल्ला मारला.
राधिका चौक परिसरात जुगार प्रकरणी दोघांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
झाडावरुन पाला काढताना पडल्याने सुरेश शामराव नलवडे (वय 65, रा. मंगळवार पेठ, सातारा) यांचा मृत्यू झाला.
नागालँड विधानसभा निवडणुकीत रिपाईच्या दोन उमेदवारांनी विजय मिळवला. या विजयानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) वतीने सातारा येथे शुक्रवारी फटाक्यांची आतिषबाजी व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.