राज्यातील महसूल विभागात कारकून पदे तत्काळ भरावीत तसेच नायब तहसीलदारांच्या बाबतीत नवीन काढलेला आदेश शासनाने रद्द करावा, या प्रमुख मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या कर्मचाऱ्यांनी एकत्रित येत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.
डिजिटल सभासद नोंदणीमुळे गाव व खेड्यातील काँग्रेसचा कार्यकर्ता पुन्हा सक्रिय झाला असून सातारा जिल्ह्यात काँग्रेस पक्ष आणखी मजबूत होईल, असा आशावाद महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.
मार्केटमध्ये कैरीचं पन्हं सहजतेने उपलब्ध असतं, पण तुम्ही हे पन्ह घरच्या घरी देखील बनवू शकता. उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. घराबाहेर पडल्यावर उन्हाच्या झळा जाणवू लागतात. अशा दिवसांत आपल्या सर्वांचा कल थंड पेय पिण्याकडे असतो. मात्र थंड कोल्डड्रिंक पिण्यापेक्षा कैरीचं पन्ह हा एक उत्तम पर्याय आहे. कैरीच्या पन्ह्याचं सेवन उन्हाळ्याच्या दिवसांत खूप फायदेशीर मानलं जातं.
लहान वयात हाताचा थरकाप होण्याच्या समस्येकडे कधीही दुर्लक्ष करू नये. हात थरथरण्याचा त्रास कोणत्याही वयात होऊ शकतो. सामान्यतः वृद्धापकाळात ही समस्या अधिक बळावू शकते. अनेक कारणांमुळे ही समस्या कोणत्याही वयात होऊ शकते. पार्किन्सन्स आजारातही हात थरथण्याची होण्याची समस्या उद्भवू शकते. लहान वयात हाताचा थरकाप होण्याच्या समस्येकडे कधीही दुर्लक्ष करू नये.
बहिणीचे फोटो का काढतोस? असा जाब विचारत एकाला सातारा बसस्थानक परिसरात सहाजणांनी मारहाण केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
मालगाव, ता. सातारा येथे एकाला मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी केल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा- कोरेगाव मार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण जखमी झाल्याची घटना घडली.
भाटनिमगाव (ता. इंदापूर) येथील पशुवैद्यकीय अधिकारी साताराकडे जात असताना शुक्रवारी (दि ८) लोणंद-सातारा महामार्गावरील अंबवडे चौकाजवळ ट्रक-दुचाकी अपघातात ठार झाले. श्रीकांत रवींद्र शिंदे असे मृत पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव आहे.
गत दोन दिवसांपासून राज्यभरात उष्णतेची लाट आली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रचंड तापमानामुळे नागरिक हैराण असून देशात विदर्भ सर्वाधिक उष्ण ठरला आहे. विदर्भात सूर्य तपळण्यास सुरूवात झाली आहे. मंगळवारी चंद्रपूर (43.4 अंश) जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक उष्ण शहर ठरले.
45 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेची मानाची गदा कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटील याने अत्यंत दिमाखात शनिवारी रात्री झालेल्या अंतिम फेरीमध्ये पटकावली. त्याने लढतीमध्ये पाच विरुद्ध चार गुणांनी मुंबईच्या विशाल बनकर यांचा शेवटच्या दीड मिनिटांमध्ये दुहेरी पट काढून पराभव केला. यानंतर पृथ्वीराज समर्थकांनी त्याला उचलून घेत आखाड्यामध्ये एकच जल्लोष केला.