कराड, सातारा, उंब्रज व पाटण या चार ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या चार टोळ्यांमधील तब्बल 23 जणांना तडीपार करण्याचा महत्त्वपूर्ण आदेश पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिला आहे. संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी घेतलेला हा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय मानला जात आहे.
अपेक्षित प्रतिसाद, सहकार्य, चांगला विश्वासू सहकारी गट मिळाला नसल्याने किसनवीर सहकारी साखर कारखाना निवडणुकीतुन स्वाभिमानाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने माघार घेतली असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजु शेळके यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
सातारा : कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय यांच्याकडील अधिसूचनेनुसार बैलगाडी शर्यतीचे आयोजन करू इच्छिणाऱ्या आयोजकांनी बैलगाडी शर्यत आयोजित करण्याच्या किमान 15 दिवस आधी अनुसूची अ मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या नमुन्यामध्ये तसेच प्रत्येक बैलगाडी शर्यतीकरीता बॅक हमीच्या स्वरूपात किंवा मुदत ठेव पावतीच्या स्वरूपात रूपये पन्नास हजार इतक्या प्...
जाणून घेऊया उन्हाळ्यात मडक्याच्या पाण्याचे होणारे फायदे.
बेदरकारपणे ट्रक चालवून चाळीस वर्ष इसमाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी ट्रक चालकावर हलगर्जीपणाचा ठपका ठेवून बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृताचा मावसभाऊ संदीप हरी बागल राहणार सोलापूर यांनी बोरगाव पोलीस ठाण्यांमध्ये फिर्याद दिली आहे.
सातारा तालुका पोलिसांनी वडूथ आणि आरळे येथे दोन वेगवेगळ्या जुगार अड्ड्यावर कारवाई करून दोघांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईमध्ये अकराशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कोडोली तालुका सातारा येथील गुलमोहर मंगल कार्यालयाच्या परिसरात एमआययडिसी रोडवर अज्ञात चोरट्याने पंधरा हजार रुपये किमतीची बजाज डिस्कवर मोटर सायकल चोरून नेल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
रेल्वे रूळ ओलांडत असताना रेल्वेची धडक बसून 43 वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक 18 एप्रिल रोजी सकाळी साडेनऊ वाजता देऊर कोरेगाव च्या हद्दीत बिचुकले पुलावर घडली.
सातारा एसटी स्टँड परिसरातील 7 स्टार इमारतीनजिक बेशुद्धावस्थेत आढळलेल्या 35 वर्षीय युवकाचा जिल्हा रुग्णालयांमध्ये मृत्यू झाला. यासंदर्भात सिविल हॉस्पिटल चे डॉक्टर एस आर फाळके यांनी सातारा शहर पोलीस ठाणे मध्ये फिर्याद दिली आहे.
येथील भवानी पेठेत घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी २० हजार ८० रुपये रोख व पाच चांदीची नाणी चोरून नेल्याची तक्रार शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.