वर्ये तालुका सातारा येथे पत्र्याच्या शेड मधून 75 हजाराचे लोखंडी साहित्य अज्ञाताने लांबवल्याची घटना दिनांक 19 मे रोजी रात्री साडेबारा ते 23 मे दुपारी साडेबारा या दरम्यान घडली. याप्रकरणी मंगेश अरुण जाधव वय 44 राहणार वर्ये, तालुका- जिल्हा सातारा यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
गोडोली परिसरातील अजंठा चौक येथे निळ्या रंगाची हिरो होंडा दुचाकी चोरी होण्याची घटना दिनांक 12 मे रोजी घडली आहे. सकाळी साडेदहाच्या दरम्यान हा चोरीचा प्रकार घडला. याप्रकरणी अमोल सुभाष काशीद वय 32 राहणार गोविंद नगर संभाजीनगर कोडोली यांनी फिर्याद दिली आहे.
सतरा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या माण तालुक्यातील एकावर दहिवडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात पोक्सो अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
सातारा पालिकेचे राज्य संवर्गातील कर्मचारी बदलीच्या प्रक्रियेमध्ये असून या संदर्भातील बदल्यांचे आदेश लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती मिळत आहे. यासंदर्भातील विनंती बदल्यांचे अर्ज नगर विकास विभागाने सरळसेवा पोर्टलच्या माध्यमातून भरून घेतले आहेत. गेले तीन वर्ष सातारा नगरपालिकेला सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या ऐन निवडणुकीच्या काळात बदल्या होणार असल्याने दैनंदिन कामे ठप्प होणार आहेत.
संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट च्या निवडणुकीत माजीउपसरपंच संतोष उर्फ बाळासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखालील श्री सेवागिरी "रयत" संघटनेने विरोधकांचा 4 -2 ने धुव्वा उडवत सफाया केला.
सातारा पालिकेने शाहू चौकातील अजिंक्य मटण शॉप बगाडे हॉस्पिटल या दरम्यानची अतिक्रमणे हटवली. अतिक्रमण मोहिमेदरम्यान टपरीधारक आणि पालिकेचे कर्मचारी यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. मात्र अतिक्रमण विभागाने कोणालाही न जुमानता धडक कारवाई केल्याने शाहू चौक ते महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यालय हा रस्ता पूर्णपणे मोकळा झाला.
सध्या बाजारात आंबा आला आहे. पण अजूनही योग्य प्रमाणात आंबा न आल्याने आंब्याचे भाव चढेच आहेत. त्यामुळे अगदी पोटभर यथेच्छ आमरस खाणे आणि आंब्यांचा आस्वाद (eating mango) घेणे बऱ्याच घरांमध्ये झालेले नाही. तिथून मग खऱ्या अर्थाने आमरसाचा हंगाम सुरू होतो.. यथेच्छ, भरपूर आमरस खा. पण त्यासोबतच आंबा किंवा आमरस खाल्ल्यानंतर कोणत्या गोष्टी खाणे टाळावे, हे देखील लक्षात असू द्या. कारण चुकीच्या सवयीमुळे विरुद्ध अन्न खाल्ले गेले तर आरोग्य आणि त्वचा या दोन्हींचेही नुकसान होऊ शकते.
सदरबझार, सातारा येथून रस्त्याने निघालेल्या शकुंतला विश्वनाथ पवार वय ६0, रा. सदरबझार यांना रविवार, दि. २२ रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दोन युवकांनी पोलिस असल्याचे खोटे सांगून सुमारे दीड लाख रुपयांचे दागिने चोरुन नेले. याबाबत वृध्देने तक्रार दिल्यानंतर अज्ञाताविरुध्द सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, सातारा शहरातील या वाढत्या घटनेने वृध्दांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा-रहिमतपूर राज्यमार्गावर अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.