केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषी कायदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रद्द करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर देशातील शेतकरी वर्गामध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनीही आता आपले आंदोलन मागे घेण्याचे आवाहन करत कृषी कायदे रद्ध झाल्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळाला असल्याचे मत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.
केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्यमंत्रालयाद्वारे घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2021 आणि कचरामुक्त शहरे सर्वेक्षणमध्ये जिल्ह्यातील कराड आणि पाचगणी या शहरांनी बाजी मारली आहे. या शहरांना स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत देशपातळीवर पुरस्कार जाहीर झाला.
मालखेड, ता. कराड येथे बुधवार दि. 17 रोजी कृष्णा नदीपात्रात एक पुरुष जातीचा मृतदेह पोत्यात भरलेल्या अवस्थेत आढळला होता. हा घातपाताचा प्रकार असून मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने पोत्यात भरून पाण्यात टाकल्याचे निदर्शनास आले. परंतु, मृतदेह पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटू शकली नाही.
रांजणे हे माझ्या बरोबरच आहेत. त्यांच्या पत्नीही राष्ट्रवादीमध्ये आहेत. इच्छुक असणे हा काही गुन्हा नाही. मात्र, गैरसमजातून हा विषय पुढे गेला असला, तरी एक-दोन दिवसात हा विषय मार्गी लागेल, असा विश्वास आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल बोलताना व्यक्त केला.
मुख्यतः यापूर्वी कारखान्यास उत्तम ऊस विकास पुरस्कार, उच्च तांत्रिक क्षमता पुरस्कार, उत्तम आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार देवून नॅशनल फेडरेशन ऑफ को- ऑपरेटीव्ह शुगर फॅक्टरीज ने अनेकवेळा सह्याद्रि कारखान्याचा गौरव केलेला आहे. तर राज्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे यांनीही उत्तम आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार देवून कारखान्यास सन्मानित केले आहे.
कराड नगरपालिकेच्या वतीने माझी वसुंधरा अभियान 2022 व स्वच्छ सर्वेक्षण 2022 अंतर्गत सामाजिक संस्था व वैयक्तिक नागरिकांसाठी भव्य वृक्षसंवर्धन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा कालावधी दि. 15 नोव्हेंबर ते 5 मे 2022 पर्यंत असणार आहे.
मौजे पार्ले, ता. कराड येथील स्मशानभूमी सुशोभिकरण करण्याच्या कामासाठी जिल्हा नियोजन समितीच्या जनसुविधा योजनेमधून ४ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.
बुधवारी दुपारी १२.३० ते १ वाजण्याच्या सुमारास काही युवक कृष्णा नदीपात्रात मच्छीमारी करत होते. यावेळी त्यांना नदीपात्रालगत पोत्यात भरलेला सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. परिसरात त्यांची मोठी दुर्गंधी पसरल्याने त्यांच्या ही बाब प्रखार्षाने निदर्शनास आली.
नगरसेवक सुहास जगताप यांच्या कल्पनेतून सोमवार पेठेतील 15 धोकादायक चौकांमध्ये कॉनव्हॅक्स मिरर (बर्हिवर्क आरसे) बसवण्यात आले आहेत. या कॉनव्हॅक्स मिररमुळे अंतर्गत रस्त्यावरील धोकादायक चौक व वळणावर होण्याऱ्या अपघातांना आळा बसणार असून त्यांच्या या संकल्पनेचे सोमवार पेठेसह शहरातील नागरिकांमधून कौतुक होत आहे.
कराड तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध भागात वारंवार बिबट्याचे हल्ले होत आहेत. येणके येथे नुकतेच बिबट्याच्या हल्ल्यात ऊसतोड मजुरांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. त्यामुळे जिल्ह्याचे वन अधिकारी एससी ऑफीसमध्ये झोपा काढतात का?