कोरेगाव तालुक्यात कोरोनाचा प्रसार वेगाने होत असून, त्याला रोखणे सर्वांचे कर्तव्य आहे. प्रशासकीय अधिकार्यांनी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर द्यावा, त्याचबरोबर बाजारपेठेतील वाढत्या गर्दीला आवर घालणे आवश्यक आहे. गर्दी टाळण्यासाठी थेट कारवाई करा, दंडात्मक कारवाईवर जोर द्यावा,’ असे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले.
सातारा जिल्ह्याची कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता माण तालुक्यात दहिवडी शहरात रुग्णवाढीचे प्रमाण जास्त असल्याने दहिवडी शहर आणी परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. तरी अजूनही रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. दहिवडी मधील जनतेनेदेखील घाबरून जाऊ नये. जर तशी काही लक्षणे दिसल्यास समोर या. स्वतःची तपासणी करून घ्या. कोणतीही लक्षणे लपवून ठेवू नका, याचा तुम्हालाच त्रास आहे. तपासणी करून प्रशासनला सहकार्य करा. अन् जर कोणी प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन करत असतील तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशा सूचना
सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत असून, खटाव तालुक्याला देखील कोरोनाचा विळखा घट्ट बसत चालला आहे. खटाव तालुक्याच्या उत्तर भागातील महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या पुसेगाव परिसरात देखील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागल्याने दक्षता म्हणून ग्रामस्थ, ग्रामपंचायत, महसूल, पोलीस यांनी एकत्र येत पुसेगाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्याला पुसेगाव व परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संपूर्ण बाजारपेठेत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद होती. बाजारपेठेत श
कांदा हे कधी शेतकर्यांच्या तर कधी ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणणारे पीक म्हणून ओळखले जाते. मात्र, सातारा जिल्ह्यातील आणि दुष्काळ शापित माण तालुक्यातील शेवटचे टोक असणार्या कुरणेवाडीतील कांतीलाल खांडेकर व संजय खांडेकर या दोन भावांना कांद्याचे पीक वरदान ठरले आहे. त्यांनी अडीच एकर कांद्याच्या शेतीतून तब्बल 12 लाखांचे उत्पन्न मिळवून पिचलेल्या शेतकर्यांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.
दहिवडी येथील प. म. शिंदे कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी अनुजा राजेंद्र यादव हिने राष्ट्रीय सीएससी गणित ऑलिंपियाड या परीक्षेत देशात तृतीय क्रमांक पटकावला आहे.
येथील कला-वाणिज्य महाविद्यालय मायणी येथील मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. श्यामसुंदर मिरजकर यांची शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्याकडून मराठी विषयात एम. फिल व पीएच.डी.चे संशोधन करणार्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली.
‘सध्या हवामानातील बदलामुळे शेती व्यवसाय अडचणीत सापडत आहे. त्यामुळे उत्पन्नात घट होत आहे. शिवाय शेतीमाल अल्प मोबदल्यात विकावा लागत आहे. त्यामुळे शेतकर्यांनी शेती व्यवसायास पूरक समजला जाणारा दुग्ध व्यवसाय वाढवणे गरजेचे आहे. एकमेव दूध व्यवसाय असा आहे की, या व्यवसायात शेतकर्याला दर दहा दिवसांनी दुधाचा योग्य मोबदला मिळतो व यातून शेतकर्यांची शेतकर्यांचा आर्थिक स्तर उंचावला जाऊ शकतो,’ असे प्रतिपादन हिम्मत देशमुख यांनी केले.
आराध्या प्रवीण खुस्पे हिच्या चौथ्या वाढदिवसानिमित्त वावरहिरे जिल्हा परिषद शाळा येथे सातारा येथील जरग हॉस्पिटलच्या वतीने सर्वरोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये शंभर पेक्षा जास्त लोकांची मोफत तपासणी करण्यात आल्या होत्या. या कार्यक्रमाचे आयोजन बबनराव खुस्पे यांनी केले होते.
शेनवडी (ता. माण) ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंचपदी लीना धनाजी कदम तर उपसरपंचपदी सचिन पांडुरंग वाघमारे यांची निवड झाली. ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच निवडीची विशेष सभा पार पडली. यावेळी संबंधित निवडी करण्यात आल्या.
अत्यंत अटीतटीने लढलेल्या पानवन ग्रामपंचायतीमध्ये ‘राष्ट्रवादी’चा पुन्हा एकदा गजर दुमदुमला. अकरापैकी सात उमेदवार निवडून आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयश्री नानासो शिंदे यांची सरपंचपदी तर चांगुना रायचंद शिंदे यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली. सरपंचपद सर्वसाधारण खुले असताना सरपंच व उपसरपंच पदी महिलांना संधी देऊन पानवन राष्ट्रवादीने नवा आदर्श घालून दिला आहे.