भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी आणि तालुकाध्यक्ष राजेंद्र इंगळे यांच्या नेतृत्वाखाली सातारा शहरात पोवई नाका येथे महाराष्ट्र सरकारच्या भ्रष्ट कारभाराचा निषेध करण्यात आला. त्याचप्रमाणे शेतकरी आत्महत्या, महिलांवरील वाढते अत्याचार, एमपीएससी परीक्षेचे ढिसाळ नियोजन आणि मनसुख हिरेन आत्महत्याप्रकरणी हे सत्य बाहेर आले आहे, त्यामध्ये माजी पोलीस महासंचालक
राज्यभरात कोरोना विषाणूची दुसरी लाट पसरत आहे. त्याचबरोबर राज्यात कोविड लसीकरणाचा दुसरा टप्पाही सुरू झाला आहे. यातच प्रशासन कोरोना निर्मूलनासाठी, आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करत असल्याचे दिसून येत आहे. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाप्रती आपलं काही देणं लागतो, या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून माणदेशी फाउंडेशन, म्हसवड (ता. माण) संचलित माणदेशी तरंग वाहिनीच्या माध्यमातून आणि सामुदायिक रेडिओ संघटना तसेच युनिसेफ यांच्या सहकार्यातून कोरोना जनजागृती कार्यक्रम विविध माध्यमातून राबविण्यात येत आहे.
भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार सातारा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. वैभव माने, जिल्हा सचिव अनिल माळी यांच्या मार्गदर्शनाखाली वडूज शहरात महाराष्ट्र सरकारच्या भ्रष्ट कारभाराचा निषेध करण्यात आला. तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्याची मागणी ही यावेळी करण्यात आली.
महामार्ग पोलीस केंद्र, भुईंज येथे पोलीस निरीक्षक महामार्ग पोलीस कोल्हापूर विभाग शिंत्रे यांच्या हस्ते ज्या हायवे वॉरियर्स मृत्युंजय दूत यांनी अपघातामध्ये जखमींना तत्काळ मदत करून हॉस्पिटलमध्ये दाखल केले, अशा मृत्युंजय दूतांचा फुलाचे झाड व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
सातारा शहरामध्ये सायकल चोरी करणार्या टोळीचा सातारा ‘एलसीबी’ने पर्दाफाश केला आहे. या टोळीत दोन विधिसंघर्ष बालक अहेत. त्यांच्याकडून सुमारे दीड लाखांच्या 13 सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.
‘गेल्या तीस वर्षांच्या कालावधीत मोठमोठी पदे मिळूनही विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांना फलटण तालुक्यात कोणतेही भरीव विकासकाम करता आलेले नाही, विकासकामाचा त्यांनी नुसता दिखावा केला असून, आपल्या हक्काचे पाणी बारामतीकरांना विकून त्याबदल्यात पदे भोगण्यात त्यांनी धन्यता मानली आहे. त्यांच्या वयाचे भान राखून मी गप्प आहे अन्यथा त्यांची जागा आतमध्ये असती,’ असा घणाघाती आरोप खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केला.
पर्यटननगरी पाचगणी (ता. महाबळेश्वर) येथील जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीतून अनेक ठिकाणी गळती सुरू असून हजारो लिटर पाणी रस्त्यालगतच्या गटारातून वाहून जात आहे. नागरिकांच्या दृष्टीने पाणी महत्त्वाचे असलेतरी जीवन प्राधिकरणाच्या बेजबाबदार मस्तवाल अधिकार्याला पाण्याचे महत्त्व नाही. अधिकार्याच्या हलगर्जीपणामुळे पाण्याचा अपव्यय होत आहे. पाण्याच्या समस्येमुळे पाचगणीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे.
‘कृषी विभाग हा शेतकर्यांसाठी असणारा विभाग आहे. या विभागामार्फत ज्या-ज्या योजना शेतकर्यांसाठी राबविल्या जातात, त्या प्रभावीपणे राबवून याचा लाभ गरजू शेतकर्यांना द्यावा,’ अशा सूचना पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी केल्या.
गणेशवाडी (ता. खटाव) येथे फळबाग व ऊस शेतीस आग लागून लाखो रुपयांची वित्तहानी झाली आहे. याप्रकरणी वेगवेगळे दोन गुन्हे नोंद झाले आहेत.
लॉकडाऊनच्या काळातील घरगुती वीजबिले तातडीने माफ करावीत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दि. 19 रोजी सकाळी 10 वाजता फलटण-लोणंद रोड राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात व ऊर्जा मंत्री तसेच सरकारचा रस्ता रोको करून जाहीर निषेध केला.