अडचण होत आहे असे समजून वड कापायला निघालेल्या हडपसरच्या एका व्यक्तीकडून आम्ही शंभर वर्ष वयाचा हा वटवृक्ष शास्रोक्त पद्धतीने पुनर्रोपणासाठी हलवला.
सरकार म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र असतो. कोणतेही सरकार 40 लोकांसाठी चालवले जात नाही, तर ते 13 कोटी महाराष्ट्रासाठी चालवलं पाहिजे, हे सत्तेतल्या लोकांनी समजून घ्यावे, असा मार्मिक टोला त्यांनी सध्याच्या शिंदेशाही सरकारला लगावला.
साखर कारखानदारांनी इथेनॉलच्या निर्मितीसाठी आपला पुढाकार घ्यावा यातून निश्चितच शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे शनिवारी साताऱ्याच्या दौऱ्यावर येत आहेत. ते मनसेच्या महासंपर्क अभियानाची तयारी आणि कार्यकर्त्यांची संवाद या हेतूने येत असून यामुळे सातारा जिल्ह्यातील मनसे कार्यकर्त्यांच्या मध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
सातारा जिल्ह्याला ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे. या जिल्ह्याच्या प्रगतीमध्ये अनेकांचे योगदान आहे. प्रगतीचा चढता आलेख सर्वांच्या सहकार्याने यापुढेही असाच सुरु राहील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
सातारा शहरातील शनिवार पेठेतील बंद घर फोडून अज्ञाताने सुमारे 8 हजारांचे घरगुती साहित्य चोरून नेले आहे. घटनेतील अज्ञात चोरट्याविरूद्ध चंद्रशेखर कुलकर्णी (वय 64) यांनी शाहुपरी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे.
शहरातील बॉम्बे रेस्टॉरंट व एमआयडीसी येथील मोकळ्या जागेत उभे असलेले ट्रक आणि रोडरोलर मधील बॅटर्या चोरल्या प्रकरणी अज्ञाताविरूद्ध शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.
दौलतनगर, ता. सातारा येथील 45 वर्षीय नितीन कदम यांना शॉक लागला. त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला आहे.
मर्ढे, ता. सातारा येथून 23 वर्षीय युवती बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या भावाने तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यात अपघातांची मालिका सुरूच असून पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर दोन ट्रक एकमेकाला धडकून ट्रक रस्त्यावर पडल्याने वाहतूक कोंडी झाली. या दुर्घटनेत दोन्ही चालक किरकोळ जखमी झाले असले तरी अन्य वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागला.