छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी बेळगाव जिल्ह्यातील विविध गावांमध्ये पडसाद उमटू लागले असून अनेक ठिकाणी दगडफेक करण्यात आलीय. या घटनेचे पडसाद आता महाराष्ट्र राज्यातही उमटण्यास सुरुवात झालीय. याच पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट 13 वे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांनीही कर्नाटक प्रशासनाला कडक शब्दांत इशारा दिलाय.
कोरोना काळात आपल्या सर्वांना एकत्रित येता येत नव्हते. याकाळातच अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी अतिशय चांगले काम केले त्यामुळे आपण त्यांचा सन्मान करीत आहोत. तसेच कोरोना काळात जिल्हा कोरोनामुक्ती करण्यास अंगणवाडी सेविकांचे काम प्रशंसनीय असल्याचे प्रतिपादन सहकार, पणन तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
गोवारे, ता. कराड गावच्या हद्दीत जानुगडे वस्तीचे खाली नदीकडेला करंजाचे झाडाला दोरीच्या सहाय्याने एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी 17 रोजी दुपारी घडली.
फलटण येथे क्षुल्लक कारणावरून अल्पवयीन 4 ते 6 वर्षांच्या लहान मुलांसह त्यांच्या आईलाही काठीने मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली. या छोट्या बालकांसह त्यांच्या आर्इला मारहाण करणाऱ्या महिला पोलीस कर्मचारी आगम यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना निलंबित करण्याची मागणी मारहाण झालेल्या पिडीत महिलेसह फलटण दत्तनगर परिसरातील नागरिकांनी केली आहे.
बेलवडे बुद्रुक गावावर स्व. यशवंतराव मोहिते (भाऊ), स्व. जयवंतराव भोसले (आप्पा), स्व. विलासराव पाटील (काका) यांचे विशेष प्रेम होते. स्व. मोहनराव मोहिते आणि पै. जगन्नाथ मोहिते यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा बेलवडे बुद्रुक गावाला लाभला असून तो असाच पुढे चालू राहील, असे प्रतिपादन कराड दक्षिणचे युवा नेते डॉ. अतुल भोसले यांनी केले.
स्वच्छ पर्यावरणासाठी पुढील काही वर्षांमध्ये जास्तीत-जास्त इलेक्ट्रिक वाहने वापरणे काळाची गरज आहे. भविष्यात नागरिकांनी जास्तीत-जास्त प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करणे पर्यावरणाच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
पुसेगाव जिल्हा परिषद गटात पाच वर्षात आमदार शशिकांत शिंदे व माझ्या जिल्हा परिषद फंडातून कोट्यवधींची कामे केली आहेत, असे प्रतिपादन जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या व जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ. सुनिता कचरे यांनी केले.
दिव्यांग व्यक्तींना दुर्लक्षित न करता समाजाने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करावा. तसेच त्यांचे आत्मबल वाढवावे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली निघाला नसल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका पुढे ढकलण्यास नकार दिल्यानंतर राज्य सरकारने निवडणुकांबाबत निर्णय घेण्यासाठी चेंडू निवडणूक आयोगाकडे टोलवला होता. आयोग या निवडणुका पुढे ढकलणार का? याकडे लक्ष लागलं होतं. मात्र, आता निवडणूक आयोगानं देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. इतकंच नव्हे, तर आयोगानं आरक्षणाशिवाय संबंधित २७ टक्के जागांच्या निवडणुकांसाठी सुधारीत तारीख देखील जाहीर केली आहे.
महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा असलेल्या बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू करण्याबाबत तत्कालीन फडवीस सरकारने एप्रिल २०१७ मध्ये विधानसभेत कायदा मंजुर केला. तसेच, बैलांच्या धावण्याच्या क्षमतेचा अहवाल तयार करण्यासाठी समिती गठीत केली, तसेच तज्ज्ञ वकीलांचा खर्च राज्य सरकार उचलेल, असे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले.