जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयावर तसेच प्रत्येक घरावर दि. 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत तिरंगा ध्वज फडकविण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकाविण्याबरोबर शासनाच्या होणाऱ्या विविध कार्यक्रमामध्ये उस्फुर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी केले.
देशात केंद्र सरकारने जीएसटी आणि इतर सरकारी धोरणांचा चुकीचा वापर केल्याने महागाई प्रचंड वाढली आहे. काही यंत्रणांचा गैरवापर होत असून त्यामुळे येथील लोकशाही धोक्यात आल्याची टीका माजी गृहराज्यमंत्री व कॉंग्रेसचे नेते सतेज उर्फ बंटी पाटील यांनी सातार्यात केली.
रिक्षाने दुचाकीला धडक देऊन अपघातात एकाला जखमी केल्याप्रकरणी रिक्षा चालकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दुकानासमोर चारचाकी वाहन पार्किंग करण्याच्या कारणावरून तीन जणांनी एकाला शिवीगाळ, दमटाटी करून मारहाण केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे.
सातारा जिल्ह्यातून दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून दोन जण बेपत्ता झाल्याची तक्रार संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
अवैध दारू विक्री प्रकरणी कराड शहर आणि तालुका पोलिसांनी विविध सहा ठिकाणी छापे मारले असून सहा हजार सहाशे वीस रुपयांच्या देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.
सिलेंडर स्फोटात जखमी झालेल्या एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
टिपर चोरीस गेल्याचा बनाव करून इन्शुरन्स कंपनीकडून पैसे मिळवण्याचा कट करणारी टोळी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले.
राज्यपाल भगवान कोश्यारी यांना महाराष्ट्राचा जर तिटकारा असेल तर त्यांनी येथे न थांबता दुसऱ्या राज्यात जावे अशी सणसणीत टिका भाजपचे खा. उदयनराजे भोसले यांनी सोशल मिडियाद्वारे केली आहे . कोश्यारी यांच्या वक्तव्याचे आता राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. उदयनराजे यांनी राज्यपालांचा जोरदार समाचार घेतला आहे.
राज्यपाल कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटत असताना आज सातारा येथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी स्वतंत्र आंदोलन करून राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केला.