फलटण-शिंगणापूर रस्त्यावर वडले गावच्या हद्दीमध्ये ट्रीपल सीट असलेल्या दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली असून या अपघातात तीनजण जागीच ठार व 3 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जांब (ता. खटाव) ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील देशसेवा करीत असलेले जवान व सेवानिवृत्त झालेले जवान यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी माजी सैनिकांना पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
फलटण पंचायत समिती (शिक्षण विभाग) समग्र शिक्षा अभियानअंतर्गत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा झाल्या. या स्पर्धा सोमवार, दि. ८ ऑगस्ट रोजी गट साधन केंद्र फलटण येथे इ. ३ री ते ५ वी या वयोगटात झाल्या. यामध्ये सातारा जिल्हा परिषद शाळा आदर्की बुद्रुक येथील सोहम परमेश्वर भोईटे याचा प्रथम क्रमांक, स्वराली विकास भिसे, जावली हिचा द्वितीय क्रमांक तर प्रणिती प्रकाश क्षीरसागर, विडणी हिचा तृतीय क्रमांक आला.
सातारा जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून दोन दुचाकींची चोरी झाल्याची तक्रार संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कंटेनरमधील अज्ञात चालकाने इरटीका कारला धडक देऊन झालेल्या अपघातात तीन जणांना जखमी केल्याप्रकरणी कंटेनर चालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पुणे-बेंगलोर महामार्गावर गाडीस धडक देऊन गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी ट्रक चालकावर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये सातारा जिल्ह्यात अपघातांची मालिका सुरू असतानाच म्हावशी ता. खंडाळा येथे शुक्रवारी रात्री भरधाव आलेल्या कारने दोन दुचाकींना धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले असून या घटनेत दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. कारचालक मद्य प्राशन करून कार चालवत असल्याचे समोर आले असून त्याला खंडाळा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कौटुंबिक वादातून नातवाने वयस्कर आजीचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना फलटण येथे घडली आहे. या घटनेमुळे फलटण शहरात खळबळ उडाली आहे.
स्वराज्य नागरी सहकारी पतसंस्थेच्या फसवणुकीच्या तक्रारीवरुन फलटण पोलिसांनी दिगंबर आगवणे यांना अटक करुन त्यांची पोलीस कोठडीत रवानगी केली होती. त्यानंतर आता आगवणे यांच्या अडचणीत आणखीन वाढ झाली असून दुसऱ्या एका आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात त्यांना फलटण पोलिसांनी अटक केली
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवनिमित्त वीरांगना प्रतिष्ठान, सैनिक फेडरेशन, इनरव्हील क्लब आँफ कँम्प सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने देश सेवेत हुतात्मा झालेल्या वीर जवानांच्या वीर पत्नींचा सन्मान करण्यात आला.