Satara

esahas.com

जिल्ह्यात रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचार बंदी

‘राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला आहे. सातारा जिल्ह्यातील काही प्रमाणात रुग्णांची वाढ होत आहे. खबरदारीच्या उपापयोजना म्हणून सातारा जिल्ह्यात रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत संचार बंदी लागू केलेली आहे,’ अशी माहिती पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.

esahas.com

शिवरायांच्या ‘राज्यशैली’चे अनुकरण केल्यास ‘भारत’ महासत्ता बनेल

शिवगान स्पर्धेमुळे, शिवरायांच्या शौर्य, ध्यर्य, पराक्रम, बुद्धिचातुर्य, स्वयंशिस्त आदी गुणांचा प्रसार होऊन ते अंगीकारण्याची जाणीव जागृती झाली आहे. आगामी काळात शिवगान स्पर्धा अधिक व्यापक पद्धतीने आयोजित करण्यात आमचे नेहमीच सहकार्य राहील. तसेच युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज एकमेवाद्वितीय राजे होते. त्यांच्या राज्यशैलीचे अनुकरण केल्यास भारत देश महासत्ता बनेल,’ असा आशावाद खा. उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला.

esahas.com

छ. शिवरायांचा विचार म. फुल्यांनी रुजवला

छत्रपती शिवरायांचा इतिहास उजेडात आणण्याबरोबरच त्यांचा मानवी कल्याणाचा विचार महात्मा जोतिराव फुल्यांनी महाराष्ट्राच्या मातीत रुजवला. रायगडावरील छत्रपतींची समाधी शोधून जगातील पहिली जयंती त्यांनी साजरी केली. शिवरायांवरील पहिला पोवाडाही म. फुल्यांनी लिहिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्र लिहिताना पत्राची सुरुवात जयशिवराय या शब्दाने करत असत. त्यामुळे छ. शिवराय समजून घ्यायचे असतील तर म. फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आधी वाचले पाहिजेत,’ असे प्रतिपादन साहित्यिक अरुण जावळे यांनी केले. 

esahas.com

जिल्ह्यात दिवसभरात 93 कोरोनाबाधित

जिल्ह्यात रविवारी दिवसभरात 93 बाधितांची नोंद झाली असून, 7 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

esahas.com

छ. शिवाजी महाराजांनी समाज परिवर्तनाची मुहूर्तमेढ रोवली

‘मध्ययुगीन काळात अनेक सत्तांनी अनियंत्रित राजेशाहींचा अवलंब केला असताना शिवाजी महाराजांनी कल्याणकारी राजेशाहीचा अवलंब केला. शिवकाळातील राजकारण हे समाजहितासाठी होते. जनतेच्या अडचणी सोडविणे त्यांना वेळेत न्याय मिळवून देणे, या गोष्टी महाराज स्वतःचे आद्यकर्तव्य समजत होते. शिवाजी महाराज म्हणजे भविष्याचा वेध घेणारे एक महान असे कर्मयोगी राजे होते. समाज परिवर्तनाची मुहूर्तमेढ महाराजांनी अंधकारमय समजल्या जाणार्‍या मध्ययुगातच रोवली ही गोष्ट नक्कीच आजच्या राजकारणाला, सत्तेलाही मार्गदर्शक ठरावी अशीच आहे,’ अ

esahas.com

जिल्ह्यात दिवसभरात 53 कोरोनाबाधित

जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात 53 बाधितांची नोंद झाली असून, दोन बाधितांचा मृत्यू झाला असून, 41 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

esahas.com

जयभवानी विकास मंडळाने शिवजयंतीला केला कोरोना योद्ध्यांचा सन्मान

गडकरी आळी येथील जय भवानी विकास मंडळ व शिवगणेश ग्रुपमार्फत शिवजयंतीचे औचित्य साधून कोरोना महामारीच्या या काळामध्ये खर्‍या अर्थाने ज्यांनी मोलाची कामगिरी बजावली अशा कोरोना योद्ध्यांचा मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी मंडळातील युवकांचे कार्य आदर्शवत असल्याचे सपोनि विशाल वायकर यांनी सांगितले.

esahas.com

वाहन चालकांना त्रासदायक ठरणारी लोखंडी जाळी अखेर काढली

गेल्या कित्येक दिवसांपासून सातार्‍यातील वरच्या रस्त्यावर वाहनचालकांना अडथळा ठरणारी व्हॉल्व्हवर बसवलेली लोखंडी जाळी नगरपालिका प्रशासनाने हटवली आहे. त्याखालील जलवाहिनीच्या व्हॉल्व्हची दुरुस्ती झाल्यानंतर त्याठिकाणी पुन्हा जाळी न बसविता तेथे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. 

esahas.com

जिल्ह्यात दिवसभरात 70 कोरोनाबाधित

जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात 70 बाधितांची नोंद झाली असून, 33 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

esahas.com

धरणाच्या कामामुळे कास-बामणोली रस्ता वारंवार होतोय बंद

कास धरणाच्या भिंतीची उंची वाढवण्याचे काम जोरात सुरू आहे. या धरणाचा सांडवा बांधण्यासाठी कास, धावली, जुंगटी, बामणोली, तेटलीकडे जाणारी वाहतूक तीन महिन्यांसाठी बंद करून ती अंधारी कोरघळ एकीवमार्गे वळवण्याच्या हालचाली संबंधित विभागाच्या सुरू असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र, तसे झाल्यास स्थानिकांना वेळेसह 20 किमीचे अंतर वाढत असल्याने मोठा भुर्दंड सोसावा लागणार असल्याने या निर्यणाविरोधात कास, धावली, बामणोली, तेटली विभागातील नागरिकांतून जनक्षोभ उसळू लागला असून कास धरणाशेजारूनच तत्काळ पर्यायी रस