धकाधकीच्या अन् वेगवान धावत्या आयुष्यातून वेळ काढून महिला सक्षमीकरणाचा वसा घेतलेले भोंदवडे येथील पेशाने शिक्षक असलेले दयानंद पवार हे 1985 पासून म्हणजे जवळपास 35 वर्षांपासून परळी खोर्यातील मुली-महिला सक्षम व्हाव्यात तसेच येणार्या सर्व परिस्थितीशी निर्भिडपणे सामोरे जाण्याकरिता प्रोत्साहन देण्याचे कार्य करताहेत.
जिल्ह्यात शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 186 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले असून एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
‘त्यांना’ ‘बचती’चं ‘बाळकडू’ लहानपणीच मिळालं अन् तीच ‘बचत’ आता त्यांची सवय झालीय. त्याच ‘बचती’च्या संकल्पनेतून ‘त्यांनी’ ग्रामीण भागात एक नव्हे तर चक्क चार ‘महिला बचत गटां’ची स्थापना करून महिलांचं एक नवीन जाळं विणलंय. याच बचतगटाच्या माध्यमातून ‘त्या’ नवनवीन उपक्रम राबवून महिलांच्या कलागुणांना वाव देत ‘त्यांना’ स्वयंपूर्ण/आत्मनिर्भर करताहेत...त्याच ‘शीतल’ताईंच्या प्रेरणादायी कहाणीवर 8 मार्च ‘जागतिक महिला दिना’च्या पूर्वसंध्येला टाकलेली ही अल्पशी नजर...
‘केंद्र शासनाच्या विविध विकासाच्या योजनांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करावी. खास करून ग्राम विकासाच्या योजनांवर भर द्यावा.जेथे विकासाच्या योजना राबविण्यात अडचणी येतील, त्या सोडविण्यासाठी केंद्र शासनाच्या विभागांशी समन्वय करून सोडविल्या प्रयत्न केला जाईल,’ अशी ग्वाही जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) अध्यक्ष तथा खा. श्रीनिवास पाटील व सहअध्यक्ष खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिली.
‘केंद्र सरकारच्या सेंट्रल रोड फंड योजनेतून केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांना सातारा जिल्ह्यातील विविध विकासकामे मार्गी लावण्याविषयी विनंती केली असून, ना. नितीन गडकरी यांनी सेंट्रल रोड फंडामधून जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न येणार्या अंदाजपत्रकात केला जाईल, असे आश्वासन दिले आहे. ना. गडकरी यांचा दिला शब्द खरा करण्याचा नेहमीच प्रयत्न असतो. त्यामुळे केंद्राच्या सेंट्रल रोड फंड योजनेत सातारा जिल्ह्यातील अनेक कामांचा समावेश होईल आणि त्याकरिता भरीव निधी मिळेल,’ असा
जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात 157 बाधितांची नोंद झाली असून, दोन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर 42 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
सातारा जिल्हा निसर्गसंपन्नतेने नटलेला महाराष्ट्रातील विषम पर्जन्यमान असलेला जिल्हा आहे. सातारा जिल्ह्याचे ऐतिहासिक महत्त्व देखील अनन्यसाधारण आहे. महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम सातारा जिल्ह्याने यापूर्वी अनेक वेळा समर्थपणे केले आहे. समाजकारण, राजकारण, याच्या पलीकडे जावून, पुरोगामी विचाराच्या सातारा जिल्ह्याच्या भौगोलिक विषमतेमुळे राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये विविध रस्त्यांच्या मजबुतीकरण, डांबरीकरण, दर्जोन्नतीकरिता भरीव तरतूद करावी, अशी मागणी खा. उदयनराजे भोसले यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मं
‘सद्य:स्थितीतही छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली युद्धनीती उपयुक्त असून, आपल्या देशाच्या संरक्षण विभागाने शिवयुद्धनीतीतून धडे घेण्याची आवश्यकता आहे,’ असे मत इतिहास अभ्यासक अनंत जोशी यांनी व्यक्त केले.
जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात 129 बाधितांची नोंद झाली असून, एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर 38 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
सातारा जिल्ह्यातील कोरोना विषाणू संशयित अथवा संक्रमिक रुग्ण संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी लग्न समारंभाबाबत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सुधारित आदेश जारी केले आहेत.