पोलिओचे समूळ उच्चाटन करण्यासाठी रोटरी इंटरनॅशनलने भरीव कामगिरी केली आहे. याविषयी समाजात अजूनही जनजागृती करणे आवश्यक आहे. त्यासाठी जागतिक पोलिओ दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ कराड, इनरव्हील क्लब ऑफ कराड, संगम व रोट्रॅक्ट क्लब ऑफ कराड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने कार जनजागृती रॅली काढण्यात आली.
"निर्भया पोलीस चौकी” यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज सातारा येथे फिर्यादी पो.कॉ. सुहास जगन्नाथ कदम ब.नं. ३०२ हे कर्तव्यावर हजर असताना, सायन्स कॉलेजचा विद्यार्थी जयराज धनंजय जाधव रा. काशिळ ता. कराड जि. सातारा हा आला व त्यास तीन मुलांनी मारहाण केल्याची तक्रार दिल्याने पो. कॉ. सुहास कदम यांनी त्यातील एकाच्या मोबाईल क्रमांकावर फोन करुन त्यास निर्भया पोलीस चौकी येथे येण्यास सांगितले असता, आरोपीने निर्भया पोलीस चौकीमध्ये येवून फिर्यादीस आरेरावीची भाषा वापरुन फिर्यादीच्या वर्दीची कॉलर पकडून धक्काबुक्की केल्याने
एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची एक वर्षात नोकरी घालवणार असं विधान राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलं होतं. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी त्याला प्रत्युत्तर दिलं आहे. वानखेडेंची नोकरी जाते की नवाब मलिक यांचं मंत्रिपद जातं है पाहुया, असा खोचक टोला रामदास आठवले यांनी लगावला आहे.
सैदापुर, ता. सातारा येथे राहत्या घरासमोर बेशुद्ध पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
येथील जुना मोटर स्टँड परिसरात जुगार अड्डयावर छापा टाकून पोलिसांनी १ हजार ४४४ रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत केले.
ट्रॅक्टरचे काम करीत असताना टायर फुटून डिस्क चेहऱ्यावर लागून झालेल्या अपघातात जखमी झालेल्या एकाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटना घडली.
खिंडवाडी, ता. सातारा गावच्या हद्दीत ट्रक आणि दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात जखमी झालेल्या एकाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटना घडली.
आंतरराज्य मोटार सायकल चोरट्याला ताब्यात घेण्यात कराड शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आले आहे. त्याच्याकडून चोरीच्या 16 मोटार सायकल जप्त करण्यात आल्या आहेत.
ठाकरे सरकारच्या शेतकरी द्वेषामुळे राज्यातील हजारो शेतकरी कुटुंबांच्या घरात ऐन दिवाळीत अंधार पसरला असून शेतकऱ्याची दिवाळी काळी करण्यास ठाकरे सरकारचा नाकर्तेपणा कारणीभूत आहे. वारेमाप आश्वासने व घोषणांचा पाऊस पाडून एकही घोषणा कृतीत न आणणाऱ्या ठाकरे सरकारने आमच्या प्रश्नांची जाहीर उत्तरे द्यावीत, अन्यथा जनतेचीव शेतकऱ्याची फसवणूक केल्या प्रकरणी सपशेल माफी मागावी
सातारा जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राचे मी नाही... मी नाही... करणाऱ्यांनी अतोनात नुकसान केले. शून्य आकारात स्टेडियम बांधले की व्यापारी संकुल, ज्यांनी हे पाप केले अशा तत्कालीन लोकप्रतिनिधिच्या व पालकमंत्री यांच्या कानफाटात लावली पाहिजे, असे खळबळजनक वक्तव्य भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.