समाजातील सर्व महिला या गांभीर्याने काम करतात, आपल्याला दिलेले काम करताना त्या कामाची कोणतीही तक्रार करत नाहीत, असे प्रतिपादन शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर च्या सुमती लांडे यांनी केले.
सातारा शहराच्या पूर्वेला गोडोली परिसरात असणाऱ्या गोडोली तलावाच्या सुशोभीकरणासाठी केंद्र शासनाच्या अमृत-2 योजनेतून तब्बल साडेचार कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे. केंद्रीय जलशक्ति मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी या प्रस्तावाला तत्त्वतः मंजुरी दिली आहे. या निधीमधून तलावासाठी विविध सुविधा दिल्या जाणार आहेत.
चारचाकी वाहनाची जाहीरात पाहून संपर्क करत ऑनलाईन व्यवहार केल्यानंतर वाहन आणण्यासाठी गेल्यानंतर मात्र फसवणूक झाल्याचे समोर आले. यावरुन डॉ. संदीप कोतवाल व नितीन धारपुरे (दोघे रा. पुणे) यांच्या विरुध्द सातारा शहर पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा सिव्हील हॉस्पिटलमध्ये सोनाली दिपक जोशी (वय 25, रा. मंगळवार पेठ, सातारा) यांना दि. 17 रोजी उपचारासाठी दाखल केल्यानंतर 18 रोजी पहाटे त्यांचा उपचारावेळी मृत्यू झाला.
‘अग्निपथ’ या केंद्र शासनाच्या योजनेवरुन काही राज्यात उद्रेक निर्माण झाल्याने सातारा जिल्ह्यातील सोशल मिडीया पोलिसांच्या रडारवर आला आहे. कायदा व सुव्यवस्था निर्माण होतील असे मेसेज फॉरवर्ड करु नयेत. अन्यथा संबंधित व्यक्ती व ग्रुप ऍडमिनवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. दरम्यान, सर्वांनी शांतता राखावी, असे आवाहन एसपी अजयकुमार बन्सल यांनी केले आहे.
पुण्याकडे भरधाव वेगाने निघालेल्या आयशर टॅम्पोने वारकर्यांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात 30 वारकरी जखमी झाले असून एका वारकर्याचा मृत्यू झाला आहे.
ओबीसी आरक्षणावर जाहीर झालेल्या निकालानंतर जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार गट-गण यांची अंतिम रचना जाहीर झाली असून यात ७ नव्या गटांची भर पडली आहे. गणपतीनंतर किंवा दिवाळी अगोदर ह्या निवडणुका पार पडल्या जातील असे दिसून येत आहे.
साहित्य संमेलन आणि वाद यांचे जवळचे नाते असते. त्यामुळे कोणतेही संमेलन घेताना काळाचा संदर्भ घेणे गरजेचे असते. आजच्या काळामध्ये विचार महत्त्वाचा आहे. सध्या अस्वस्थतेचे युग सुरू आहे आणि धर्माच्या दावणीला राष्ट्र बांधण्याचा प्रयत्न विविध शक्तींकडून केला जात आहे, असे प्रतिपादन मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांनी केले.
माझ्या लिहिण्याच्या प्रवासात मासिकांची यंत्रणा प्रबळ होती. मासिकांमुळे मला मोठा वाचकवर्ग मिळाला आणि एक लेखिका म्हणून घडण्यात मासिक संस्कृतीचे मोठे योगदान आहे. मासिकांच्या योगदानाची मराठी समीक्षकांनी जेवढी दखल घ्यायला हवी होती, तेवढी घेतली नाही, असे मत ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांनी व्यक्त केले.
पुसेगाव, ता. खटाव येथील ग्रामीण भागातील संजीवनी हॉस्पिटल सर्जिकल सेंटर पुसेगाव येथे पी सी एन एल किडनी मधील मुतखड्यासाठी अत्याधुनिक दुर्बिणीद्वारे करण्यात येणारी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली.