सातारा पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या एका पोलीस उपनिरीक्षकास युवकानं मारहाण केल्याची घटना कोरेगाव शहरात घडली. या युवकास पोलीसांनी अटक केली आहे.
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे दिग्गज नेते गुलाम नबी आझाद यांनी सोनिया गांधींना पाच पानी पत्र लिहून पक्षाचा राजीनामा दिला असतानाच, आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्रातील निवडणुकीबाबत मोठा गौप्यस्फोट केलाय.
नकाशाचे अतिक्रमण केलेल्या व्यक्तीचे नोंद प्रकरण घेऊन ते मंजूर करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेताना सातारा येथील नगर भूमापन अधिकारी कार्यालयातील प्रमुख लिपिक शामराव शंकर बांदल वय ५२ रा. रामकुंड, पुष्प ज्योतिबा अपार्टमेंट, सातारा हे अलगद लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले.
वाई, ता. वाई येथे नदीमध्ये पाय घसरून पाण्यात बुडून एकाचा मृत्यू झाल्याची नोंद वाई पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
शेंद्रे, ता. सातारा येथे मोकळ्या जागेत पार्किंग केलेला ट्रॅक्टर अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
शाहूपुरी परिसरात असणाऱ्या माजगावकर माळ परिसरातील जुगार अड्डयावर छापा टाकून पोलिसांनी पोलिसांनी ३७ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत सात जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. ही कारवाई शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने केली.
अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी कारचालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
वाळू माफियांशी लागेबांधे जोपासणे माणच्या तहसिलदारांना चांगलेच महागात पडले असून याप्रकरणी थेट महसूल मंत्र्यांकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याच संबंधामुळे तहसीलदार सूर्यकांत येवले यांची काही काळासाठी उचलबांगडीही करण्यात आली होती. सध्या ते दीर्घ रजेवर गेल्याचे समजते.
रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव मेनकुदळे यांनी आश्वासन दिल्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातून निलंबित करण्यात आलेल्या आणि महाविद्यालयासमोर गुरुवारपासून आंदोलन करणाऱ्या मनोहर कदम यांनी तात्पुरत्या स्वरूपात आपले उपोषण मागे घेतले.
केंद्रीय वाणिज्य मंत्री सोमप्रकाश दिनांक 28 ते 30 जून दरम्यान सातारा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यामध्ये केंद्र शासनाच्या अनुदान योजना, त्याचा प्रसार-प्रचार, संघटनात्मक पातळीवर सदस्य आणि कार्यकारणीशी चर्चा तसेच जाहीर मेळावे आणि रॅली असा भरगच्च दौरा आखण्यात आला आहे. याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.