तालुक्यातील विसापूर गावात एका 70 वर्षीय हनुमंत भाऊ निकम व कमल हनुमंत निकम वय 65 या पती-पत्नीचा खून झाला असल्याची भयंकर घटना घडल्याने खटाव तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. या दुहेरी हत्याकांडाची नोंद पुसेगाव पोलीस ठाण्यामध्ये झाली आहे.
निढळ, ता. खटाव येथील सर्व अंगणवाडी विद्यार्थी यांची निढळ गावातून दिंडी काढण्यात आली. यावेळी चिमुकली पालखी तयार करणेत आली होती. चिमुकल्यानी वारकरी वेष धारण केला होता. ज्ञानोबा माऊली तुकाराम चा गजर करत व पुढे भगव्या पताका घेऊन हे छोटे वारकरी अत्यंत उत्साहात दिसून येत होते.
अनुदानित शाळांसाठी विवेकानंद अकॅडमी या शाळेकरीता नजीकच्या शाळेचे अंतर 1 किलोमीटर असल्याची बाब शिक्षण विभागाच्या निदर्शनास आणून देऊनही शिक्षण विभाग याकडे मुद्दाम दुर्लक्ष करीत आहे, असे श्री सारदादेवी चारिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा श्रीमती शकुंतला काटकर यांनी सांगितले.
खटाव तालुक्यातील वडूज या ठिकाणी शिवसेनेचा आक्रमक चेहरा असलेले शिवसेना तालुकाप्रमुख शहाजीराजे गोडसे व कट्टर शिवसैनिक युवराज पाटील, बाळासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संतप्त शिवसैनिकांनी मंत्री एकनाथ शिंदे, शुभराज देसाई, आ. महेश शिंदे यांच्या फोटोला उलटे टांगून लाल मिरच्यांची धुरी दिली.
श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टच्या वतीने शनिवार २ जुलै ते सोमवार ११ जुलै दरम्यान आषाढी पायी पालखी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची मुक्काम, अल्पोपहार, जेवण, आरोग्यसेवा तसेच औषधपाण्याची मोफत सोय करण्यात आली आहे.
विसापूर ता. खटाव येथील सुभेदार विजय सर्जेराव शिंदे हे लेह लडाख येथे देशसेवा बजावत होते. भारतीय लष्कराचे वाहन श्योक नदीत अपघातग्रस्त झाले. या अपघातात त्यांना वीरमरण आले. त्यांच्या वीरगतीमुळे गेली दोन दिवस विसापूरसह संपूर्ण खटाव तालुका शोकसागरात बुडाला आहे.
केंद्र शासन पुरस्कृत अटल भूजल योजना महाराष्ट्रातील ७ जिल्हयामध्ये राबविली जात असून सातारा जिल्हयातील खटाव, माण व वाई तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे. सध्या खटाव तालुक्यातून या ग्रामस्तरीय शिबिराचा प्रारंभ झाला झाला असून खटाव तालुक्यातून या योजनेत ३२ गावांचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती अटल भूजल योजनेचे कनिष्ठ भू वैज्ञानिक एम. एम. गडकरी यांनी भुरकवडी ता. खटाव येथे संपन्न झालेल्या अटल भूजल योजनेच्या शिबीरावेळी दिली.
दुष्काळी भागात नैसर्गिक वरदान लाभलेल्या येरळवाडी धरण परिसरात परदेशी पक्ष्यांच्या आगमनाने पर्यटक व अभ्यासकांची वाढ झाली आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यास वाव असला तरी स्थानिक वन विभागाचा दुर्लक्षितपणा व अभाव यामुळे खटाव तालुक्यातील वन विभागाच संशयाच्या पिंजऱ्यात अडकला आहे.त्याची वरिष्ठ पातळीवर चौकशी करावी अशी मागणी येरळवाडी सह खटाव तालुक्यातील वृक्षप्रेमींनी केली आहे.
पुसेगाव, ता. खटाव ग्रामपंचायतीच्या वतीने गुरुवारी संपूर्ण गावामध्ये "निर्जंतुकीकरण मोहीम" राबविण्यात आली. श्री सेवागिरी महाराज यात्रेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण गावात मशीनच्या साहाय्याने औषध फवारणी करून हे निर्जंतुकीकरण करण्यात आले.
पुसेगाव, ता. खटाव पोलिस ठाणे हद्दीतील कुख्यात गुंड दत्तात्रय दादासो मसुगडे (वय 22, रा. रणसिंगवाडी, ता. खटाव) याला माण, खटाव, कोरेगाव, फलटण या चार तालुक्यातून एक वर्षाकरीता हद्दपार करण्यात आले असल्याचे पुसेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संदिप शितोळे यांनी सांगितले.