सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांना मिळाली. सपोनि देशमुख यांनी तात्काळ आपली टीम घेऊन खाजगी वाहनाने सदर ठिकाणी जाऊन छापा मारला. त्या ठिकाणी तीन ट्रॅक्टर व आठ इसम अवैधरित्या वाळू उपसा करत असल्याचे निदर्शनास आले. यातील दोन ट्रॅक्टर व तीन लोकांना पकडण्यात पोलिसांना यश आले असून इतर पाच जण व एक ट्रॅक्टर घेऊन फरार झालेले आहेत.
सातारा जिल्हा आता कोरोनाचा हॉटस्पॉट बनू लागला आहे. जिल्ह्यात सोमवारी 661 जण बाधित झाले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या आता 14,658 झाली आहे. तर 15 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
कोरोना व्हायरसने सर्वत्र धुमाकूळ घातला असून, लोकांच्या मनातील भीती कमी झाल्याने बाजारपेठेत होणार्या गर्दीने शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात बेरजेने वाढणारा आकडा आता गुणाकाराने दुपटीने वेगाने वाढू लागला आहे. यामध्ये मायणीत चार दिवसांत 41 बाधितांची अचानक भर पडल्याने कोरोनाबाधितांच्या आकड्याने शंभरी ओलांडली आहे. त्यामुळे मायणीसह परिसरातील गावांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
दहा हजारांची लाच मागितल्याप्रकरणी कराड येथील वैधमापनशास्त्र कार्यालयातील निरीक्षक आणि क्षेत्र सहायक अशा दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
‘सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सर्वसामान्य शेतकर्यांच्या हिताचे नेहमीच प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे काम करत आहे. फलटण पंचायत समितीच्या प्रांगणात सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने एटीएमची सेवा दिल्याने एटीएमची सेवा ग्राहकांच्या हिताचे ठरणारी आहे,’ असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केले.
शासकीय कृषी महाविद्यालय, कराड अंतर्गत ग्रामीण कृषी जागृकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम जुलै 2020 पासून विविध गावांमध्ये राबवला जात आहे. या कार्यक्रमांतर्गत कराडच्या कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी कृषिदूत अभिजित लालासाहेब राऊत व सुजय शंकर घनवट यांनी माण तालुक्यात डंगिरेवाडी (मोही) या गावामध्ये शेतकर्यांना विविध पिकासंदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले तसेच यावेळी त्यांनी विविध इंटरनेट अॅपच्या माध्यमातून पिकावरील रोग किडी कशा ओळखाव्यात याची माहिती दिली.
हॉकीचे सर्वकालीन महान खेळाडू मेजर ध्यानचंद या महान खेळाडूचा गौरव म्हणून 29 ऑगस्ट हा दिवस ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ म्हणून देशभर साजरा केला जातो. या दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. शिवाय खेळातील सर्वोच्च जीवन गौरव पुरस्कार म्हणून 2002 पासून ध्यानचंद पुरस्कार देण्यात येतो. आपल्या कारकिर्दीत खेळात असामान्य कर्तृत्व दाखवणार्या आणि निवृत्तीनंतरही त्या खेळासाठी जीवन वेचणार्या क्रीडापटूला ‘ध्यानचंद जीवन गौरव’ पुरस्क
खटाव तालुक्यात तीन दिवसांत सुमारे 101 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तालुक्यातील अनेक लहान, मोठ्या गावांत कोरोनाने चांगलेच हातपाय पसरल्याने कोरोनाचा घट्ट विळखा बसला आहे. या आजाराने आत्तापर्यंत सात जणांचे बळी गेले आहेत.
गावठाण पासून हाकेच्या अंतरावर असणार्या एकाच कुटुंबातील दहा जणांना काल कोरोनाची बाधा झाल्याने कातरखटावकरांची झोप उडाली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने बाधित परिसर सील केला आहे. दरम्यान, मंगळवार (दि. 1) पासून चार दिवसांसाठी गावात कडक लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय कोरोना कमिटीने घेतला आहे.
सातारा जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. दररोज 500 ते 600 रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. रविवारीदेखील 489 कोरोनाबाधित आढळले आहेत तर 11 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 13,997 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.