भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामना म्हटले की, दर्शकांचे पैसावसूल मनोरंजन निश्चित असते. मग त्यांचा सामना क्रिकेटच्या मैदानावर रंगो अथवा हॉकीच्या. शुक्रवारी (१७ डिसेंबर) हॉकीच्या आशियाई चँपियन्स ट्रॉफीमध्ये हे कट्टर प्रतिद्वंद्वी संघ आमने सामने आले होते. उभय संघांमध्ये झालेल्या या सामन्यात भारताने पाकिस्तानवर ३-१ ने थरारक विजय मिळवला.
गेल्या 48 तासांत भारतीय टेलिव्हिजनवरील मालिकांमध्ये जसे नाट्य रंगते, तसेच नाट्य भारतीय क्रिकेटमध्येही कर्णधारपदावरून रंगले. बीसीसीआयचे उच्च पदस्थ पदाधिकारी आणि निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी विराट कोहलीला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्यास सांगितले. मात्र, कोहलीने त्याबाबत कोणतेही प्रत्युत्तर न दिल्यामुळे त्याची कर्णधारपदावरून उचलबांगडी करण्यात आली, अशी चर्चा आहे.
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या पुरुष हॉकी संघाने कांस्यपदक मिळवून नवा इतिहास नोंदविला होता. अनुभवी गोलरक्षक पीआर श्रीजेश आशियाई चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी उपलब्ध राहू शकणार नसल्याने हॉकी इंडियाने मनप्रीत सिंगकडे नेतृत्व सोपविले आहे.
महाड, रायगड येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय सबज्युनियर मुले व मुलींच्या बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सातारा संघाचे प्रतिनिधित्व करताना सातारा बॉक्सिंग अकॅडमीच्या खेळाडूंनी ४ सुवर्ण पदक, १ रौप्यपदक आणि १ कांस्य पदक अशा एकूण ६ पदकांची कमाई केली.
20 वर्ल्ड कप संपताच आता पुढील क्रिकेट सीरिजचे वेध लागले आहेत. राहुल द्रविड टीम इंडियाचा पूर्णवेळ प्रशिक्षक झाल्यापासून ही भारतीय क्रिकेट टीमची पहिली सीरिज न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे.
वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्रच्या शिवराज राक्षेने उत्तर भारतीय मल्लांचे तगडे आव्हान मोडून काढीत खुल्या गटात सुवर्णपदक मिळवले. फ्रीस्टाईल प्रकारात पुरुष व महिला मल्लानी दोन रौप्य आणि सात कास्य ग्रीकोरोमनमध्ये देखील तीन कास्यपदकासह महाराष्ट्राच्या संघाने दहा कास्यपदकाची कमाई करीत घवघवीत यश प्राप्त केले.
नीरजला नुकताच देशातील सर्वोच्च क्रिडा पुरस्कार मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला असून १३ नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दिला जात आहे. देशाला पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळवून दिल्याबद्दल त्याचे खूप कौतुक झाले आहे.
विश्वचषकानंतर विराट कोहलीने आराम घेतल्यामुळे कसोटी संघाचे नेतृत्व रहाणेकडे सोपवण्यात आले आहे. रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी आणि ऋषभ पंत यांनाही कसोटीमध्ये आराम देण्यात आला आहे. के. एस भरत आणि वृद्धमान साहा यांच्याकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
कोरोना महासाथीचे संकट अजून पूर्णत: टळले नाही आणि याच कारणामुळे कित्येक क्रीड संस्था या स्पर्धेचे आयोजन करताना अतिशय खबरदारी बाळगत आहेत. याच पार्श्वभूमीवर इस्तंबूलमध्ये पुढच्या महिन्यात सुरू होणाऱ्या जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या स्पर्धेला मार्च २०२२ पर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.
कर्णधार विराट कोहलीचे टी-२० वर्ल्डकपचे विजेतेपद मिळवण्याचे स्वप्न अखेर भंगले. रविवारी झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने अफगाणिस्तानचा ८ विकेटनी पराभव केला आणि भारताचे आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२१ मधील आव्हान संपुष्टात आले. आता भारताची नामिबियाविरुद्धची लढत फक्त औपचारिकता असेल.