निसर्ग संवर्धनाच्या उद्देशाने आणि आपल्या चिरकाल स्मृती, आठवण, सौहार्दपूर्ण जिव्हाळा जोपासण्यासाठी जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या घराच्या परिसरात एकतरी झाड लावावे असे, आवाहन सातारा जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समितीने केले आहे.
तीर्थक्षेत्र शिखर शिंगणापूरमध्ये महिलांनी गौराईचा आगमन पूजन सोहळा उत्साहात साजरा केला. याप्रसंगी शिंगणापूरमधील काही महिलांनी गौराई सणात समाज प्रबोधन, धार्मिक स्थळे, विवाह सोहळा, पर्यावरण समतोल, पाणी अडवा पाणी जिरवा, झाडे लावा झाडे जगवा, प्रदूषणमुक्त परिसर संकल्पना, श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा व पारंपरिक जुन्या रूढी-परंपरा, तसेच कोरोना बचाव देखावा असे सामाजिक संदेश देणारे देखावे साकारले होते.
जिल्ह्यात बारा बाधितांचा उपचादरम्यान मृत्यू झाल्याने काळजीत भर पडली आहे.
विटा : येथील प्रतिथयश डॉ. विलासराव महादेव साळुंखे (वय ७७) यांचे निधन झाले. शिवप्रताप उद्योग समूहाचे अध्यक्ष, नॅशनल गोल्ड अॅन्ड सिल्व्हर रिफायनरी असोसिएशन चे अध्यक्ष प्रतापराव साळुंखे यांचे बंधू होत. त्यांच्यामागे पत्नी एक मुलगा, मुलगी , सुना , नातवंडे व तीन भाऊ असा परिवार आहे. शिवप्रताप को - आॅप मल्टीस्टेट पतसंस्थेच्या निर्मिती मध्ये त्यांचा महत्त्वपुर्ण सहभाग होता. सामाजिक कार...
सातारा जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वेगाने वाढू लागला आहे. बुधवारी आतापर्यंतचे उच्चांकी 505 नवे बाधित आढळून आले तर नऊ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे आतापर्यंत 11,643 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
लोकडाउन शक्य नसून कायदेशीर अडचण असल्याचे नमूद करत. विविध संघटनांची व्यापक बैठक झाली यात विटा शहरात शुक्रवार ते सोमवार अखेर पूर्ण पणे जनता कर्फ्यू लागू करण्याचे आवाहन करण्याचा निर्णय झाला - तहसीलदार ऋषिकेश शेळके
सातारा जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. मंगळवारी 485 नवे बाधित आढळून आले तर नऊ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
‘चितळीतील कार्यकर्ते जिद्दीचे व चिकाटीचे आहेत. मागील निवडणुकीत दिलेल्या मताधिक्यामुळे वाडीवस्तीत विकासाची कामे करून त्यातून उतराई होण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्नशील आहोत. गावातील विकासगंगेत जे या विकासापासून दूर राहिले आहेत, त्यांना सोबत घेऊन विकासकामातून चितळीत परिवर्तन करणार आहे,’ असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांनी केले.
रहिमतपूर आरोग्य केंद्रात दोन डॉक्टर असून सुद्धा आरोग्य सुविधांची वानवा पाहायला मिळत आहे. कारण, आरोग्य केंद्रात रात्रीच्या वेळेस डॉक्टर उपलब्ध नसल्याने या आरोग्य केंद्राची जबाबदारी परिचारिका आणि कंपाउंडरवर पडत येत आहे. तसेच रात्री-अपरात्री जर एखादा पेशंट आरोग्य केंद्रात आला तर त्याची डॉक्टराविना गैरसोय होत आहे. त्यामुळे आरोग्य केंद्राच्या मनमानी कारभाराला रुग्ण वैतागले असून, 24 तास रुग्णांच्या सेवेसाठी डॉक्टर उपलब्ध असावेत, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
लक्षणे जाणवताच कोरोनाची चाचणी करून, तातडीने उपचार घेतल्यास रूग्ण बरा होऊ शकता. यासाठी सर्वांनी लक्षणांकडे दूर्लक्ष न करता लवकरात लवकर उपचार घ्यावेत, असे आवाहन डॉ. सुरेश भोसले यांनी केले.