जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 496 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत, तर 9 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
दिवसेंदिवस खटाव तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून, आज एकाच कुटुंबातील चौघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने शास्त्रीनगर येथील बाधित रुग्णांचा परिसर सील केला आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरू झाला असून बाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. सोमवारी दिवसभरात तब्बल 496 बाधित आढळून आले तर 9 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
कमी कालावधीत रोख पैसे मिळवून देणारे पीक म्हणून शेतकरी मूग पिकाची कोरडवाहू पट्ट्यात आंतरपीक म्हणूनही लागवड करतात. मात्र, यंदाच्या हंगामात लागवड झालेल्या मुगाचे संपूर्ण पीक कीड आणि रोगांमुळे शेतकर्यांच्या हातातून गेले आहे. त्यामुळे लागवडीसाठी केलेला खर्चसुद्धा निघण्याची शक्यता नाही. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे संबंधित विभागाने नुकसानग्रस्त पिकाची पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकर्यांमधून होत आहे.
म्हसवड शहरात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतच असून, दि. 23 रोजी आलेल्या अहवालानुसार शहरात आणखी 5 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, म्हसवड शहराची शतकाकडे वाटचाल सुरू आहे.
जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात विविध रुग्णालयांत व कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेले 240 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
गाईच्या दूधाला दर देण्याच्या मागणीसह दूध उत्पादक शेतकर्यांच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली दि. 24 जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.
जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरूच असून वेगाने संसर्ग पसरू लागला आहे. 6 ऑगस्टला 5 हजार बाधित होते तर अवघ्या 17 दिवसांत रुग्णसंख्या दुप्पट होवून दि. 23 रोजी बाधितांनी दहा हजारांचा टप्पा ओलांडला आहे. रविवारी 443 नवे बाधित आढळल्याने एकूण रुग्णसंख्या आता 10,157 इतकी झाली आहे.
पुसेगावसह परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण आणि पाऊस सुरू असल्याने खरीप हंगामातील पिके पिवळी पडू लागली असून, पिकांची वाढ देखील खुंटली आहे. तसेच पिकांवर विविध कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी, उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे पेरणीस केलेला खर्च वसूल होणार की नाही, याबाबत शेतकरी चिंतेत सापडला आहे.
माण तालुका सेवानिवृत्त संघटनेमार्फत कोरोना काळात मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत म्हणून दोन लाखांचा धनादेश माणच्या तहसीलदार बाई माने यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.