कराड शहर पोलिसांनी अवैध गुटखा वाहतूकी विरोधात कारवाई करीत दोघांना अटक केली आहे. या दोघांच्या ताब्यातील एस्टीम कारसह 3 लाख 59 हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील विविध ठिकाणी झालेल्या पाच अपघातात सहाजण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सातारा जिल्ह्यात आठ ठिकाणी सुरू असणाऱ्या देशी दारूच्या अड्ड्यांवर छापे टाकून पोलिसांनी १३ हजार ९९५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी 25 डिसेंबर रोजी भारतीय जनता पार्टीतर्फे सुशासन दिनानिमित्ताने राज्यात मोदी सरकारच्या 7 वर्षांतील कामगिरीची माहिती देणारी व्याख्याने, ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान, ई श्रम कार्ड वितरण असे विविध कार्यक्रम होणार असून सातारा जिल्ह्यात देखील विविध कार्यक्रमांचे आयोजान करण्यात आले असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी यांनी दिली.
सातारा विकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर सातारा शहरात अनेक बदल करण्यात आले. जगाबरोबरच सातारा शहरालाही कोरोनाचा मुकाबला करावा लागल्यामुळे नगरपालिकेच्या माध्यमातून काम करताना नगरसेवकांना अनेक अडचणी आल्या मात्र त्याही परिस्थितीत कोरोना बाधित नागरिकांना सातारा विकास आघाडीच्या नगरसेवकांनी वेगवेगळ्या माध्यमातून मदतीचा हात दिला.
डिसेंबर महिन्याच्या मध्यावर कोरोना संसर्गाचा आलेख सध्या अल्पवाढीत देखील थोडा खालीवर होताना दिसत असला तरी सातारा जिल्ह्यातील कोरोना स्थिती आटोक्यात आलेली आहे. तर दुसरीकडे लसीकरणाने वेग घेतलेला असून जिल्ह्यात तब्बल 35 लाख 76 हजार 991 नागरिकांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे.
स्थानिक युवकांना रोजगार मिळवून देण्याच्या दुहेरी हेतूने राज्यातील १४ प्रसिद्ध पर्यटन स्थळी पर्यटन सुलभ मार्गदर्शक (ट्रॅव्हल गाईड) प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याचा समावेश असणार असल्याची माहिती विभागीय पर्यटन कार्यालय पुणेच्या सहायक संचालक सुप्रिया करमरकर यांनी दिली आहे.
सातारा शहरातील राजवाडा बसस्थानकात उभारण्यात आलेल्या भिंतीशिल्पाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या परवानगी शिवाय केल्याप्रकरणी पुण्याचे मिलिंद एकबोटे आणि सातारा नगरपालिकेचे नगरसेवक विजय काटवटे यांच्यासह पंचवीस ते तीसजणांवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा शहरासह जिल्ह्यामध्ये पारा घसरल्याने गारठा वाढला आहे. उत्तर भारतातील वाढत्या थंडीच्या तीव्रतेने सातारकर गारठले असून उबदार स्वेटर कान टोपी जर्कीन यांचा वापर वाढला आहे .आज साताऱ्यात किमान 12 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
तालुक्यातील जिंती गावातील तांबे परिवारातील विवाह समारंभावेळी जयवंत तांबे यांनी आपल्या मुलीच्या लग्नात कन्यादान म्हणून तब्बल एक लाख रुपयांची पुस्तके उपलब्ध करून देऊन आज समाजापुढे एक आदर्श निर्माण करून दिल्याने परिसरात हा कौतुकाचा कौतुकाचा विषय ठरला असून तांबे यांचे परिसरातून अभिनंदन होत आहे.