कराड नगरपालिकेत मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत नाव नोंदणी सुरू करण्यात आली आहे.
सातारा जिल्हयासाठी जिल्हादंडाधिकारी यांनी कोविड-१९ बाबत सुधारित आदेश पारीत केले आहेत.
सातारा शहराची हद्दवाढ होऊन सुमारे दोन वर्षे उलटली तरी अद्यापही सातारा शहराच्या नवीन प्रभागात घंटागाडी सेवा अद्यापही पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. याचे मूळ कारण आरोग्य विभागाचे घंटागाडीचे टेंडर प्रशासकीय घोळा मध्ये अडकून पडले आहे. फाईल जिल्हाधिकाऱ्यांच्या टेबलावर असूनही अद्याप त्यावर सही झालेली नाही.
सातारा नगरपालिकेच्या प्रभाग रचना संदर्भात जी गोपनीयता बाळगायची आहे त्याचा सातारा नगर पालिका प्रशासन व मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याकडून गोपनीयता भंग झाल्याची तक्रार मंगळवार पेठ येथील रहिवासी हरी रामदास शिवशरण यांनी निवडणूक आयोगाकडे पत्रकाद्वारे केली आहे. या गोपनीयता भंगाची सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
कोयना धरण परिसराला मंगळवारी सकाळी ९.४७ वाजता भूकंपाचा सौम्य धक्का या परिसरात बसलाय. भूकंपमापन यंत्रावर या भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता ३.३ रिश्टर स्केल एवढी होती, तर भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना विभागातील काडोली गावाच्या पश्चिमेला ७ किमी अंतरावर होता.
दरम्यान, प्रत्येक पोलीस ठाण्याच्या आवारात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे संपर्क फलक दर्शनी भागात का लावले नाहीत? याबाबत चौकशी करून, फलक न लावणाऱ्या पोलीस प्रमुखावर कडक कारवाई करणं गरजेचं आहे. तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यामध्ये; लाचखोराला कडक शिक्षा होण्यासाठी प्रभावी बदल होणंही आज काळाची गरज आहे. कारण लाचखोराला कडक शिक्षा; हाच मोठा उपाय, भविष्यातील अनेक लाचखोरी प्रकरणांना आळा घालणारा ठरू शकतो आणि राज्यात पोलिसांच्या डागाळलेल्या प्रतिमेला थोडाफार का होईना उजाळा मिळू शकतो.
पांढरीचीवाडी (तारुख) ता. कराड येथील धरे नावाच्या शिवारात ऊसाच्या फडात बिबट्याची तीन पिल्ले आढळली. ऊसतोड मजुरांना सोमवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास बिबट्याची पिल्ले सापडली. त्यांनतर याबाबतची माहिती वनविभागाला देण्यात आली. त्यांनतर वनविभागाने बछड्यांची त्यांच्या आईसोबत मिलन घडवून आणण्याचा निर्णय घेतला आहे.
कर्नाटक येथून पुणे येथे बंदी असतानाही बेकायदेशीरपणे, अवैधरित्या १७ लाख रुपयांचा विमल गुटखा एका टेम्पोमध्ये घेऊन जाणाऱ्या दोघांना ताब्यात घेऊन तो गुटखा हस्तगत करण्यात सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला यश आले असल्याची माहिती पोलिस अधीक्षक अजय बन्सल यांनी प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना दिली.
अडीच वर्षांपूर्वी सातारा जिल्ह्यात आलेल्या कोरोनाने अनेकांच्या आयुष्याची पुरती वाताहत केली. कोणाच्या कायमच्या नोकऱ्या गेल्या, कोणाचे व्यवसाय देशोधडीला लागले. लॉकडाउन नंतर लॉकडाउन झाल्यामुळे अनेकांना आपल्या कुटुंबापासून कित्येक काळ दूर रहावे लागले. याच काळात सातारा जिल्ह्यात एका प्रेमी युगलाची अजब प्रेम की गजब कहानी सर्वांनाच पाहायला मिळाली.
येथील शिवराज पेट्रोल पंपाच्या समोर असणाऱ्या कुलावंत ट्रॅक्टर ट्रॉली व ओमनी कार यांच्यामध्ये झालेल्या अपघातात एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी सुरेश बळीराम निकम रा. मिल्ट्री अपशिंगे, ता. सातारा यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.