शहर पोलीस ठाण्यात येऊन पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी महेश गजानन गोंदकर (रा. प्रतापगंज पेठ, सातारा) यांना न्यायालयाने १ हजारांचा दंड, व दंड न दिल्यास १ महिना साधी कैदेची शिक्षा सुनावली.
गौण खनिजची चोरी केल्याप्रकरणी केळघर, ता. जावली येथील सचिन विष्णू विरामणे याच्यावर मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सुमारे सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल घेऊन जाताना तो आढळून आला.
प्लॉट विक्री करण्याचे सांगून एकाची सुमारे सात लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. याबाबत गिरवी, ता. फलटण येथील दिगंबर आगवणे यांच्यावर आणखीन एक गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी सातारा जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असणाऱ्या दारू अड्डयावर छापे टाकून ४ हजार ४८० रुपयांच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या.
शिंदेवाडी फाटा, ता. फलटण येथून एक जण बेपत्ता झाल्याची तक्रार फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
निंभोरे तालुका फलटण गावच्या हद्दीत एका दाम्पत्याच्या जवळ असलेली पर्स व त्यातील सुमारे ७४५०० रुपयांचा मुद्देमाल तीन अनोळखी व्यक्तींनी जबरी चोरी करून लुटून नेला आहे.
सातारा : चिखली, ता. कराड गावच्या हद्दीत बेरडकी नावाच्या शिवारात दत्तात्रय उर्फ दादासो वामन जाधव यांच्या मालकीच्या असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये राकेश उदयसिंह जगदाळे वय 44 राहणार मसूर तालुका कराड, सोमनाथ भिकू रुपनर वय 37 राहणार मसूर ता कराड, रामचंद्र संतु पवार वय 62 राहणार चिखली तालुका कराड, जालिंदर गणपती जाधव राहणार मसूर ता कराड, राजेंद्र शिवाजी निकम राहणार मसूर ता कराड, गणेश जालिं...
कोयना जलविद्युत टप्पा क्रमांक एक व दोनच्या आपत्कालीन झडप भुयार येथील 62 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या उल्लोळ विहिरीच्या अस्तरीकरणाला तडे गेले आहेत या गळतीचे अन्वेषण करण्यात आले असून ही गळती बंद करण्याच्या उपाय योजना प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती कोयना जलविद्युत विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी खा. छ. उदयनराजे भोसले यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी सुमारे अर्धा तास खा. उदयनराजे व आ. जयंत पाटील यांच्यात खलबते झाली. त्यानंतर जयंत पाटील यांनी त्यांच्या मुलाच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका खा. उदयनराजेंना देत निरोप घेतला.
सातारा जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांना शिस्त लागावी यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अचानक तपासणी मोहीम राबवली. त्यावेळी सुमारे ३० जण उशिरा आल्याचे आढळले. त्यांना समज दिली असून, दुसऱ्यांदा सापडल्यास कारवाई होणार आहे. तर ठराव समितीत विविध विषयांवर चर्चा झाली.