कोणत्याही जाती धर्माला थारा न देणाऱ्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट पक्षामध्ये येत्या 4 मे रोजी आपण प्रवेश करीत आहोत. पक्ष माझ्यावर जी जबाबदारी दिली ती स्वीकारून ती जबाबदारी पूर्ण क्षमतेने पार पाडण्याचा माझा प्रयत्न असेल, अशी माहिती स्वराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रकुल कार्तिकेय पार्वती महादेव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सातारा लोकसभा मतदार संघाचे महायुतीमधील भाजप चे अधिकृत उमेदवार श्री.छ. उदयनराजे भोसले यांच्या प्रचाराच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कराड येथे विराट सभा पार पडली. या सभेस जिल्हाध्यक्ष युवराज पवार यांच्या आदेशाने हजारो मनसैनिक रॅलीने उपस्थित राहिल्याने मोदींच्या विराट सभेत मनसेचाही बोलबाला झाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कराड येथील सभा यशस्वी झाल्याची जोरात चर्चा आहे. तळपत्या उन्हात हजारो भाजप कार्यकर्ते, नेते उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांना ऐकण्यासाठी तरुण वर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता.
बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांनी महायुतीचे लोकसभा उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांचा सत्कार केला. तसेच निवडणुकीसाठी त्यांना शुभेच्छा देखील दिल्या. येथील श्री बालाजी सहकारी पतसंस्थेत हा सत्कार सोहळा झाला.
हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या तळबीड, तालुका कराड येथील स्मृतिस्थळाला महायुतीचे लोकसभा उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी भेट देऊन अभिवादन केले.
जिल्ह्यात राष्ट्रीय बंजारा परिषदेने महायुतीला जाहीर पाठींबा दिला. लोकसभेचे महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना मोठ्या मताधिक्याने विजय मिळून देण्यासाठी राष्ट्रीय बंजारा परिषद प्रयत्न करेल, असा विश्वास राष्ट्रीय बंजारा परिषदेचे महासचिव व भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य अॅड. पंडित राठोड यांनी व्यक्त केला.
सातारा लोकसभा मतदार संघातील समस्त धनगर समाजाच्या वतीने, दि. 7 मे रोजी होणा-या निवडणुकीत, सातारा जिल्हयाचेच नव्हे तर महाराष्ट्राचे नेते आणि भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना जाहीर पाठींबा महाराष्ट्र धनगर समाज संघर्ष समितीने घोषित केला आहे.
कोल्हापूर नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवार दिनांक 29 रोजी सैदापूर कराड येथे सभा होत असून या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. सैदापूर येथे चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून या परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.
आधी धरण नंतर पुनर्वसन ही लोकप्रतिनिधींची भूमिका होती. मात्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून धरणांची कामे करत असताना धरणाचे काम आणि पुनर्वसन एकाच वेळी सुरू राहिले पाहिजे, अशी मी भूमिका घेतली. त्यानंतर सध्याचा पुनर्वसन कायदा अस्तित्वात आला, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली.
महाराष्ट्र राज्याचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांचे देशासाठी असलेले अमूल्य योगदान लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी मानसपुत्राने केंद्र सरकारकडे शिफारस का केली नाही, असा सवाल महायुतीचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे.