खंडाळा : शिरवळ येथील जिल्हा चेक नाक्यावरील सारोळा पुलावरुन पडून युवक बेपत्ता झाला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. शिरवळ पोलिस व महाबळेश्वर ट्रेकर्स यांच्याकडून नदीमध्ये शोधकार्य सुरु आहे. दशरथ सिंग अमरसिंग सिंग (वय 18, राजस्थान) असे पाण्यात पडलेल्या बेपत्ता तरुणाचे नाव आहे.
कोरोना विषाणूनं अवघ्या जगात हाहाकार उडाल्यानं संसर्ग टाळण्यासाठी शासनानं सर्वत्र ‘लॉकडाऊन’ जाहीर केला. त्यामुळं सर्वांना ‘घरबंद’ व्हावं लागलं. पण नोकरी अन् शिक्षणानिमित्त परशहरात ‘झेप’ घेतलेली ‘बहीण-भावंडं’ पुन्हा कुटुंबाच्या छायेखाली आली. बहीण-भावामध्ये कितीही भांडण अथवा चीड असली तरी दोघांमधील अतूट नात्यातील ‘प्रेम’ त्यांना एकत्र आणतं, हे पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे. त्यामुळं लॉकडाऊनच्या निमित्तानं ‘बहीण-भावा’चं प्रेम अधिक वृद्धिंगत झाल्याचं पाहावयास मिळालं.
रहिमतपूर, ता. कोरेगाव पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार आनंद गजानन गोसावी (वय 48) रा. व्यंकटपुरा, सातारा यांचा आज सकाळी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना कोरोनाने मृत्यू झाला. कोरोना युद्धात धोका पत्करून सेवा बजावताना दुसर्या पोलीस हवालदाराचा मृत्यू झाला आहे.
आलं आणि गवती चहा घालून केलेला चहा अनेक छोट्या-मोठय़ा तक्रारींवरचा रामबाण उपाय आहे.
हिंगाची हरभऱ्या एवढी गोळी करून दररोज खावी ७ दिवस . पोटदुखी व वायगोळा जातो .
परळी खोरे हे अतिवृष्टीचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. एकदा पाऊस सुरू झाला तो कधी थांबेल याचा अंदाज लावता येत नाही. कधी-कधी तर गावांचा कित्येक दिवस संपर्क ही तुटतो. यावर्षी तुलनेने पावसाचे प्रमाण कमी असले तरी परळी खोर्यात जोरदार पाऊस सुरू असून, त्यामुळे काळोशी येथील तलाव हा धोकादायक स्थितीत आला आहे. या तलावाच्या सांडव्याशेजारील भिंतीचा मातीचा भराव दिवसेंदिवस ढासळत असल्याने तलावा शेजारील घरांमधील नागरिकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
‘सातारा जिल्ह्यात तब्बल 2,677 इतके रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. यंत्रणा संपूर्ण सतर्क आहे. शहरासह ग्रामीण भागातही कोरोना विषाणूचा प्रभाव वाढत आहे. आरोग्य विभागाची जबाबदारी दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जनतेची साथ आता अत्यंत महत्त्वाची आहे,’ असे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
पोवई नाक्याकडून बॉम्बे रेस्टॉरंट चौकाकडे जाताना अध्यक्षांच्या बंगल्या समोरील विसावा नाक्यावरील चौकात मुख्य रस्त्यावर मधेच पडलेला खड्डा वाहनचालकांच्या विशेषतः दुचाकीस्वारांच्या निदर्शनास येत नसल्यामुळे पोवई नाक्याकडून उतारावरून येणारी चारचाकी व दुचाकी वाहने या खड्ड्यात आपटून किंवा खड्डा चुकविण्याच्या नादात गंभीर स्वरूपाचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
2019-20 च्या गळीत हंगामाचे ऊस बिल व शेतकर्यांना वीज वितरणने आकारलेली अवाच्या सव्वा वीज बिले यामधून माफी मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी निदर्शने करण्यात आली.
ग्रीन-टीमुळे तुम्ही निरोगी होता, तुमची त्वचा नितळ होते आणि तुम्हाला संपूर्ण आरोग्य स्वास्थ लाभते.