सातारा जिल्ह्यात संसर्ग वेगाने फैलावत असल्याने रुग्णसंख्या दहा हजारांच्या दिशेने वेगाने सरकू लागली आहे. बुधवारी आणखी 396 नव्या बाधितांची भर पडली असून 9 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
मत्त्यापूर (ता. सातारा) येथून दोन लाख रूपयांचे सोन्याचे दागिने चोरणार्या तीन चोरट्यांना बोरगाव पोलिसांनी अटक केली. त्यात दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.
जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरू आहे. मंगळवारी आतापर्यंतच्या सर्वाधिक बाधितांची नोंद झाली असून तब्बल 392 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच 11 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
उत्कृष्ट ग्राहकसेवा, सुरळीत वीजपुरवठा, वीजवाहिन्या व उपकेंद्रांची विनाअपघात देखभाल व दुरुस्ती करणार्या महावितरणच्या बारामती परिमंडलच्या सन 2019-20 मधील उत्कृष्ट 28 तांत्रिक कर्मचार्यांना स्वातंत्र्यदिनानिमित्त शनिवारी (दि. 15) स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.
खासदार संजय राऊत यांनी डॉक्टरांबाबत काढलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ सातारा येथे भाजपच्या वैद्यकीय आघाडी सातारा जिल्हा, सातारा शहर आणि सातारा ग्रामीण यांच्यातर्फे आंदोलन करण्यात आले. पोवई नाका येथे जोरदार निदर्शने करून अप्पर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्यपाल कोश्यारी यांना निवेदन पाठवण्यात आले.
डाॅ.सदीप डाकवे यांचे ‘दीप उजळतो आहे’ हे तिसÚया क्रमांकाचे पुस्तक आहे. पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन माजी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, ना.शंभूराज देसाई व अन्य मान्यवर यांच्या हस्ते केले होते. दुसÚया पुस्तकाचे प्रकाशन स्वतःच्या वाढदिनी अग्रलेखांचे बादशहा पद्मश्री नीलकंठ खाडीलकर (भाऊ), शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार अॅड.जनार्दन बोत्रे व अन्य मान्यवरांच्या हस्ते झाले होते.
कोरोना संकटावर मात करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्य मंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन कसोशिने प्रयत्न करीत आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा, आरोग्य विभाग यांच्यासह विविध विभाग दिवसरात्र काम करीत आहेत.
लॉकडाऊनमुळे अनेकांच्या हाताला काम नाही. काम नसल्याने खिशात पैसे नाहीत. अशा परिस्थितीत पालिकेने नोटीस बजावल्या आहेत. उदयनराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वी राज्यातल्या नागरिकांची घरपट्टी, पाणी पट्टी माफ करण्याची विनंती केली होती. त्यानुसार शहरातील सर्व नागरिकांची घरपट्टी, पाणी पट्टी माफ करावी, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष दीपाली गोडसे यांनी मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
ठोसेघरकडे जाणार्या मार्गावरील बोरणे घाटात पावसामुळे गुरुवारी मध्यरात्री दरड कोसळली असल्याने शुक्रवारी सकाळी या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. मात्र, वाहनचालकांसह प्रवाशांनी छोठे-छोठे दगड हटविल्याने एकेरी वाहतूक सुरू झाली असून, मोठमोठे दगड अद्याप रस्त्याच्या मधोमधच असल्याने ते वाहतुकीस अडथळा ठरत आहेत.
उरमोडी धरण परिसरात मुसळधार पाऊस पडत असून, या भागातील ओढे-नाले दुथडी भरून वाहत आहेत. पाण्याची आवक वाढल्याने उरमोडीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. उरमोडीचे धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर असून, 13 रोजी सकाळी आठ वाजता उरमोडी वीज गृहातून 400 क्युसेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आल्याने नदी पात्र दुथडी भरून वाहत आहे.