Satara

esahas.com

खंडणी प्रकरणी एकावर गुन्हा

एका वैद्यकीय व्यवसायिकास खंडणी मागितल्या प्रकरणी एकावर खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

सालपे येथे सुमारे सव्वा लाखाची घरफोडी

सालपे, तालुका फलटण येथे एक बंद घर फोडून अज्ञात चोरट्याने सुमारे सव्वा लाखाची घरफोडी केल्याची फिर्याद लोणंद पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

esahas.com

तडीपार गुंडाकडून पाच मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघड

तडीपारी आदेशाचा भंग करुन साताऱ्यातच राहून आणखी दुचाकी चोऱ्याही करणाऱ्या एका तडीपार गुंडासह चोरीत त्याचा साथीदार असलेल्या एकास शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून पाच दुचाकी चोरीचे गुन्हे उघड करण्यात करण्यात यश मिळवले आहे.

esahas.com

पाडेगावच्या राहुल मोहितेचे खूनी लोणंद पोलिसांच्या जाळ्यात

पाडेगाव येथे तीन महिन्यांपूर्वी राहूल मोहीते याचा गळा चिरून अज्ञातांनी निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना घडली होती. कसलाच पुरावा मागे न सोडता केलेल्या या खूनाच्या तपासाचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. लोणंद पोलिसांनी प्रयत्नांची पराकाष्ठा दाखवत अखेर या खूनाचा उलगडा करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

esahas.com

सोनी मराठी वाहिनीवर महाराष्ट्राची हास्य जत्रा परत येतेय हास्याचा चौकार घेऊन !

पूर्ण महाराष्ट्राचा लाडका कार्यक्रम अर्थातच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' १५ ऑगस्टपासून परत येत आहे. आठवड्यातले चारही दिवस हास्यरसिकांना हा कार्यक्रम बघायला मिळणार आहे. काही दिवसांची क्षणभर विश्रांती घेतल्यानंतर जत्रेकरी आता रसिकांना हसवण्यासाठी पुन्हा सज्ज झाले आहेत.

esahas.com

जिल्ह्यात दीडशे महिलांच्या नावाची शेती सातबाऱ्यावर नोंद

सातारा जिल्ह्यात सातारा, कोरेगाव, जावली या तीन तालुक्यातील बत्तीस गावांमध्ये दीडशे महिलांचे नाव शेत जमिनीच्या सातबार्‍यावर लागले आहे. लक्ष्मी मुक्ती अभियानांतर्गत ही प्रक्रिया पार पाडण्यात आली आहे, अशी क्रांतिकारी माहिती दलित महिला विकास मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष अॅडवोकेट वर्षा देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

esahas.com

जिल्ह्यातील पाच धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू

जिल्ह्यात पावसाने जोरदार बॅटींग सुरू केली असल्याने जिल्ह्यातील सर्व धरणात पाणीसाठा वाढलेला आहे. त्यामुळे कोयना धरण पाणलोट क्षेत्रात तब्बल 50 हजार क्युसेस पाण्याची आवक प्रतिसेंकद वाढली असून 4.29 टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. तर सातारा जिल्ह्यातील वीर धरण, उरमोडी धरण, मोरणा- गुरेघर मध्यम प्रकल्प, कण्हेर धरण, धोम-बलकवडी धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

esahas.com

शाश्वत विकासासाठी मानवी विकास महत्त्वाचा : चंद्रकांत दळवी

गावाचा विकास म्हणजे फक्त भौतिक विकास नसून आर्थिक विकास आणि मानवी विकास सुद्धा महत्वाचा आहे. मानवी विकासातूनच शाश्वत विकास साधला जातो, असे प्रतिपादन निवृत्त विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी केले.

esahas.com

स्वराज पतसंस्थेच्या फसवणूकप्रकरणी दिगंबर आगवणे गजाआड

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह स्वराज नागरी पतसंस्थेच्या पदाधिकारी व संचालकांवर बेछूट आरोप करुन खळबळ उडवून देणाऱ्या दिगंबर आगवणे यास स्वराज नागरी पतसंस्थेकडून दाखल असलेल्या फसवणुकीच्या तक्रारप्रकरणी अटक केली आहे.

esahas.com

आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा

९ लाख १० हजार रुपयांच्या फसवणूक केल्याप्रकरणी सौ उज्वला संपत माने, रा. वरद कलेक्शन, देगाव, ता. सातारा या महिलेवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.