येथील शंभू महादेव देवस्थानच्या ठिकाणी प्रसिद्ध असे गुप्तलिंग आहे. या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी दर्शनासाठी भाविक जातात. तसेच सुमारे तीन किमी अंतरावर निसर्गरम्य वातावरणात वसलेले धार्मिक ठिकाण असल्याने गुप्तलिंग या ठिकाणाला शिवकालिन व ऐतिहासिक वारसा असल्याने ते आध्यात्मिक क्षेत्र म्हणून ओळखले जाते. गुप्तलिंगच्या आजूबाजूच्या डोंगरभागातून छोटे-छोटे धबधबे पावसाळ्यात वाहतात. त्यामुळे हा परिसर मनमोहित करणारा आहे. याचा मनमुराद आनंद शिवभक्त पर्यटक घेत असतात. मात्र, सध्या गुप्तलिंग मंदिराकडे जाणार्या पायरी
वडूज शहरातील सर्व सलून व्यवसायिकांना दि ७ पासून आपले व्यवसाय बंद करण्याच्या सूचना वरून दिल्या आहेत. त्या प्रमाणे वडूज शहरातील सलून व्यवसाय ८ दिवसासाठी बंद ठेवली जाणार असल्याची माहिती वडूज नाभिक समाजचे अध्यक्ष शांताराम चव्हाण यांनी दिली आहे.
येथील कोविड रुग्णालयात उपचार सुरु असणार्या रुग्णाने आजाराला कंटाळून व नैराश्यातून रुग्णालयातील डॉक्टर व आरोग्य सेविकेला धक्काबुक्की व मारहाण करत पळून जाऊन कृष्णा नदी पात्रात उडी मारून आत्महत्या केली. संचित कोविडं रुग्णालयानजीक आज दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली.
लोणंद-शिरवळ चौपदरीकरणाच्या भूसंपादनातील शेतकर्याच्या रखडलेल्या प्रश्नाबाबत एक महिन्यात प्रस्ताव तयार करून मार्ग काढण्यात काढावा, निवाडयात समावेश नसलेल्या शेतकर्यांचे तडजोडीने भूसंपादन करण्याबाबत एकमत करण्यात आले आहे, मात्र यापूर्वी झालेल्या बैठकीतील मुद्दयांवर बांधकाम विभागाने कार्यवाही करण्यास विलंब केला आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने एका महिन्यात लोणंद -शिरवळ चौपदरीकरण भुसंपादनाबाबत प्रस्ताव तयार करून मार्ग काढावा अन्यथा 2 ऑक्टोबरला रस्ता रोको आदोलन करुन लोणंद -शिरवळ रस्ता उखडुन टाकण्याचा इ
वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी खराडे, ता. कराड येथील ग्रामपंचायतीने गावातील सार्वजनिक वाचनालयाला चौदाव्या वित्त आयोगातून स्पर्धा परीक्षेची पुस्तके भेट देऊन वाचन संस्कृतीला बळ दिले आहे.
‘अत्यंत शांत, संयमी, प्रसन्न व सुस्वभावी असलेल्या संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांचे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाचे योगदान आहे. शिक्षण महर्षी प. पू. डॉ. बापूजी साळुंखे यांनी उभी केलेली श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणारी संस्था आहे. त्यांच्या पत्नी संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांनी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या शैक्षणिक कार्याला व संस्था उभारणीला आयुष्यभर साथसोबत केली. संस्थेतील शिक्षण घेणार्या मुलांची,
‘आपल्या समाज व्यवस्थेतील प्रत्येक शिक्षक शिक्षणाबरोबरच आपले सामाजिक उत्तरदायित्व कर्तव्य भावनेने पार पडत असतात. विद्यार्थ्यांच्या मनावर सुसंस्कार, आचार-विचार व संस्कृती या सर्व बाबींचे योग्य मार्गदर्शन करण्याची जबाबदारी सर्व शिक्षक आपापल्यापरीने योग्य प्रकारे पार पाडत असतात.
जावळी तालुक्यात आज पुन्हा दुसर्या दिवशीही मुसळधार पावसाने हजेरी लावली. सकाळपासूनच हवेत प्रचंड उष्णता जाणवत होती. त्यामुळे लोक उकाड्याने हैराण झाले होते. अखेर दुपारी तीन वाजता ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटाने जोरदार पावसाला सुरुवात झाली. यामध्ये काढणीला आलेल्या भुईमूग, सोयाबीन, घेवडा आदी खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
जिल्ह्याभोवती कोरोनाचा विळखा घट्ट होऊ लागला असून, संसर्ग वेगाने पसरत आहे. शनिवारी दिवसभरात 827 बाधित आढळले तर 11 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
‘कोव्हिड-19 या आजाराचा फैलाव खूप झपाट्याने होत असून, दिवसेंदिवस रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र, त्या प्रमाणामध्ये रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत व काही रुग्णांना जर ऑक्सिजन देण्याची गरज भासली तर तेवढे ऑक्सिजनचे बेड आपल्या फलटणमध्ये उपलब्ध नाहीत.