‘वाढत्या लोकसंख्येमुळे अन्नाची गरज वाढली आहे. ती पूर्ण करण्यासाठी शेतकरी मर्यादेपेक्षा जास्त रासायनिक खतांचा वापर करत आहेत. त्यामुळे जमीन नापीक होत चालली आहे. मातीतील मूलद्रव्यांचे प्रमाण कमी झाल्याने मातीचा कस कमी होत चालला आहे. मातीत मीठ फुटण्याचे प्रकार घडतात, मातीची उगवण क्षमता, मातीचा कस, उत्पादन क्षमता कमी होतेय त्यामुळे माती परीक्षण ही काळाची गरज आहे,’ असे प्रतिपादन रत्नाई कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी अक्षय सत्रे याने केले.
‘नगरपालिकेची जागा नसताना विकासकामांच्या नावाखाली त्या जागेवर आमदार फंड टाकला जात असून, हा प्रकार खपवून घेणार नाही. या निर्णयाला आमचा विरोध आहे. त्या ठिकाणी आमदार फंड टाकल्यास आम्ही जिल्हाधिकार्यांकडे 308 अन्वये तक्रार करणार असून, सत्ताधारी राजे गटाकडून कोरोना काळात जनतेच्या पैशांची उधळपट्टी सुरू आहे,’ असा गंभीर आरोप फलटण नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांनी केला आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, शुक्रवारी दिवसभरात 716 जण कोरोना पॉझिटिव्ह आले तर 17 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, दिवसभरात 855 रुग्णांनी कोरोनावर मात केली.
महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात येत्या 15 दिवसांत व्हेंटिलेटर व ऑक्सिजन बेड उपलब्ध व्हावेत, अन्यथा प्रशासनास आंदोलनास सामोरे जावे लागेल, अशा आशयाचे निवेदन महाबळेश्वर येथील ‘मनसे विद्यार्थी सेने’च्यावतीने तहसीलदार सुषमा पाटील व पालिका प्रशासनास देण्यात आले आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आणि रखडलेला सातारा शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव अथक पाठपुराव्यातून मंजूर करणार्या आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा सातारा पालिकेच्या आजी, माजी नगरसेवकांच्यावतीने सत्कार करण्यात आला. दरम्यान, हद्दवाढ मंजूर झाल्याने पालिकेच्या उत्पन्नात भर पडणार असून, सातारा शहरासह, त्रिशंकू भागाचा आणि शहरालगतच्या उपनगरांचा झपाट्याने विकास होईल, असा विश्वास आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यावेळी व्यक्त केला.
जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. तसेच बळींची संख्याही वाढली असून 25 जणांचा बळी गेला आहे. तसेच गुरुवारी दिवसभरात 800 जण बाधित झाले आहेत. सध्या बळींची संख्या 582 इतकी झाली आहे.
सध्या वडूज शहरात आज पासून जनता कर्फ्यु लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस प्रशासनाकडून ठीक ठिकाणी विना मास्क फिरणाऱ्या वाहन धारकावर कारवाई केली जात आहे. त्यातच आज वडूज येथे चक्क दुचाकीवर फोन वर बोलत विना मास्क घालता एक ग्रामसेवक शहरात फिरत होते. दरम्यान पोलिसांनी त्यांना थांबवून मास्क न वापरला याबाबत काही रुपयांचा दंडाची पावती केली . मात्र मी ग्रामसेवक आहे. माझ्याकड...
कोरोनाबाधितांची संख्या सातारा जिल्हावासीयांच्या काळजात धडकी भरवू लागली आहे. बुधवारीदेखील जिल्ह्यात 817 नवे कोरोनाबाधित आढळून आले तर 21 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
गेली वर्षभर बंद असलेल्या फिल्टरेशन प्लँटमुळे कोरेगाव शहरात सध्या दूषीत पाणीपुरवठा सुरू असून, आज संतप्त नागरिकांनी आक्रमक पावित्र घेत चक्क नगराध्यक्षांच्या दालनातच प्रतीकात्मक महाळ घालून कोरेगाव नगरपंचायतीचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवण्यात आला.
फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागात सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने शेतकर्यांची त्रेधातिरपीट उडाली. हातातोंडाशी आलेल्या ऊस पिकाचे अतोनात नुकसान झाल्याने यावर्षी शेतकर्याच्या उसाचा तोटा मोठ्या प्रमाणात होणार, त्यामुळे संबंधित विभागाने झालेल्या पिकाचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकर्यांमधून होत आहे.