जिल्ह्यात दिवसेंदिवस बाधितांची संख्या वाढतच असून, शनिवारी 803 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 28 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच दिलासादायक बाब म्हणजे आज 955 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून, शुक्रवारी नव्या 622 बाधितांची नोंद झाली आहे. तर 32 बाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच 831 जणांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे.
मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासह मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता करा, अशी मागणी ठोसेघर पठारस्थित सध्या रा. कांदिवली पूर्व (मुंबई) येथील मराठी क्रांती मोर्चा सकल मराठा समाजाने विधान परिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असून, गुरुवारी दिवसभरात 915 नव्या बाधितांची नोंद झाली आहे. दरम्यान, 30 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 1003 जण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत.
कोरोना महामारीच्या काळात म्हसवड व परिसरातील सर्वसामान्य नागरिकांवर ऑक्सिजन सिलिंडरअभावी कठीण प्रसंग येऊ नये, यासाठी लोकसहभागातून उभारलेल्या म्हसवड कोविड हॉस्पिटलसाठी देसाई उद्योग समुहातर्फे पाच जम्बो ऑक्सिजन सिलिंडर देण्यात आले आहेत,’ अशी माहिती सातारा जिल्हा बँकेचे संचालक अनिल देसाई यांनी दिली.
करोना संक्रमणाची वाढती दहशत व वारंवार वाढत जाणारा बळीचा आकडा यावर नियंत्रण आणण्यात प्रशासनाची रणनीती यशस्वी होताना दिसत नाही . जिल्हा प्रशासनाने ठोस उपाययोजना राबवून त्याची कडक अंमलबजावणी करावी या मागणीसाठी सोमवारी दि 28 रोजी सर्वपक्षीय व सामाजिक संघटनांच्या वतीने मूक मोर्चा सुरक्षित अंतर पाळून काढण्यात येणार आहे, अशी माहिती नविआचे नगरसेवक अमोल मोहिते यांनी दिली.
जिह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून बुधवारी दिवसभरात 850 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 30 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे बाधितांच्या एकूण मृत्यूची संख्या आता 970 झाली आहे.
जिह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून मंगळवारी दिवसभरात 708 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 34 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे बाधितांच्या एकूण मृत्यूची संख्या आता 940 झाली आहे.
सध्या अतिशय भयावह परिस्थिती असून ऑक्सिजन अभावी अनेकांना आपल्या प्राणास मुकावे लागत आहे. कुकुडवाड गटातील कोणावरही अशी वेळ येवू नये म्हणून देसाई उद्योग समूहाकडून आरोग्य विभागाकडे पाच जम्बो ऑक्सिजन सिलिंडर सर्व मशीनसह देण्यात आले आहेत, असे प्रतिपादन सातारा जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अनिल देसाई यांनी केले.
जिल्ह्यात सोमवारी तब्बल 40 जणांचे प्राण कोरोनाने घेतले. या महामारीचा उद्रेक वाढतच असून, दिवसभरात 690 जण बाधित आढळले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 31,514 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे असून, त्यापैकी 21,125 जणांनी कोरोनावर मात केली आहे.