लोणंद येथे क्रांतिसंत श्री गुरू रविदास महाराज यांची जयंती लोणंद येथील नगरपंचायत सभागृहात व श्री गुरू रविदास मंदिर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
‘आपण सर्वांनी मराठीचा आग्रह धरला पाहिजे. यासाठी इतर भाषांचा राग अथवा अपमान करण्याची गरज नाही. फक्त एवढेच भान असायला हवे की, आधुनिक युगातील पिढीमध्ये मातृभाषा असलेल्या मराठीची गोडी कमी होत चाललेली आहे. इंग्रजी ही प्रतिष्ठेची भाषा मानून मातृभाषेबद्दल कमीपणा वाटणे, मराठी भाषेचा परकेपणा वाटणे मराठी भाषिकांसाठी लाजिरवाणी बाब आहे. अमृताते पैजा जिंकणार्या आपल्या मराठीला समृद्ध वारसा आहे. तो समृद्ध वारसा जपण्याची व मराठीचे महत्त्व वाढविण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे,’ असे आवाहन डॉ. प्रभाकर पवार या
नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांना नगरपरिषदेने हद्दवाढ क्षेत्राचा 51 कोटी रुपयांचा विकास आराखडा सादर केला असून, याबाबत आम्ही मंत्र्यांशी सविस्तर चर्चा केली आहे. ना. एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या अभिवचनाप्रमाणे लवकरच सातारा नगरपरिषदेकडे याकामी निधी प्राप्त होईल,’ अशी माहिती खा. उदयनराजे भोसले यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
जावली तालुक्यातील 54 गावांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी बोंडारवाडी धरण प्रकल्प मार्गी लागणे अत्यावश्यक आहे. हा प्रकल्प मार्गी लागावा यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार्या आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मागणीनुसार उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी सोमवारी जलसंपदा आणि पाणीपुरवठा विभागाची महत्त्वाची बैठक बोलावली. या बैठकीत ना. पवार यांनी बोंडारवाडी धरण प्रकल्पाचा परिपूर्ण प्रस्ताव येत्या महिनाभरात तयार करून शासनाकडे सादर करण्याच्या सूचना जलसंपदा विभागाच्या अधिकार्यांना केल्या. दरम्यान, प्रस्ताव त
स्टेट बँकेतील अधिकार्यांनी व कर्मचार्यांनी येणार्या ग्राहकांना चांगली वागणूक द्यावी, अन्यथा मनसे स्टाईलने खळळ्खट्याक् दाखवून देऊ, असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी दिला आहे. याबाबत सोमवारी मनसेच्या पदाधिकार्यांनी वडूज शाखा व्यवस्थापक यांना लेखी निवेदन दिले.
फेसबुक, व्हॉटस्अॅपद्वारे ओळख वाढवून भेटायला बोलवण्याच्या बहाण्याने हनीट्रॅपमध्ये अडकवून लुटमार करणार्या टोळीचा सातारा तालुका पोलिसांच्या डी. बी. पथकाने पर्दाफाश केला आहे.
जिल्ह्यात रविवारी दिवसभरात 177 बाधितांची नोंद झाली असून, एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर 17 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
खटाव तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या पुसेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी महाविकास आघाडीच्या विजय मसणे तर उपसरपंचपदी पृथ्वीराज जाधव यांची बिनविरोध निवड झाली. बिनविरोध निवडीनंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून जल्लोष साजरा केला.
खटाव तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणार्या रणसिंगवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुखदेव रणसिंग तर उपसरपंचपदी विठ्ठल मसुगडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
‘अनुवादक हे वेगाने विस्तारणारे करिअर आहे. ज्या विद्यार्थ्यांचे भाषेवर प्रभुत्व आहे आणि ज्यांना करिअरच्या वेगळ्या वाटेवर जायचे असेल त्यांनी ‘अनुवाद’ या क्षेत्राचा नक्कीच विचार करावा. त्यात अर्थार्जन तर होईलच; परंतु वेगवेगळ्या विभाग, प्रदेश, देशांचा सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक असा अभ्यासही त्यातून करता येईल,’ असे प्रतिपादन महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे कार्यकारी विश्वस्त विजय मांडके यांनी केले.