‘मायणी येथे असणार्या ब्रिटिशकालीन तलावावर परदेशी फ्लेमिंगो व इतर पक्ष्यांचे आश्रयस्थान असल्याने मायणीसह कानकात्रे, येरळवाडी, सूर्याचीवाडी तलाव क्षेत्रात लवकरच पक्षी संवर्धन राखीव क्षेत्राचा दर्जा प्राप्त होणार आहे,’ अशी माहिती मुख्य वनसंरक्षक डॉ. व्ही. क्लेमेंट बेन यांनी दिली.
‘माण तालुक्यात जरी दुष्काळ असला तरी या भागातील शेतकर्यांची कष्ट करण्याची तयारी असल्यामुळे शेती क्षेत्रातील प्रगती ही उल्लेखनीय आहे. शेतकर्यांनी सेंद्रिय शेती करत मत्स्य व्यवसाय व पशुसंवर्धन व्यवसायाकडे वळले पाहिजे,’ असे मत बारामती अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या समन्वयक सुनंदाताई पवार यांनी माण तालुक्याच्या एक दिवसीय दौर्याप्रसंगी असताना व्यक्त केले.
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने संपूर्ण सातारा जिल्ह्यात दक्षता घेण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून जिल्हा परिषदेच्यावतीने पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ‘अर्सेनिक अल्बम-30’ या गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून ओळखल्या जाणार्या शंभू महादेवाचे देवस्थान असलेल्या शिंगणापूरमध्ये लांब पल्ल्याच्या बसेस कायमच धावत असतात. मात्र, यंदा कोरोना महामारीने सर्वत्रच थैमान घातल्याने एसटीची सेवा सुमारे 5 महिन्यांपासून बंद होती.
औंध, ता. खटाव येथील ज्योती गॅस एजन्सीचा परवाना रद्द करावा, अशी मागणी केंद्रीय मानवाधिकार संघटनेचे तालुकाध्यक्ष सोमनाथ साठे यांनी तहसीलदारांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
महाबळेश्वर शहरात आज 13 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असून, यामध्ये पालिकेचे नाक्यावरील कर्मचारी, स्वच्छता विभागाच्या काही कर्मचार्यांचा समावेश आहे. आजअखेर शहरातील बाधितांची संख्या 184 झाली असून, 58 जण कोरोनामुक्त आहेत तर महाबळेश्वर तालुक्यात आजअखेर 375 कोरोनाबाधित असल्याची माहिती मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी दिली.
कोरेगाव तालुक्यातील दरे गावच्या हद्दीत माळरानावरील पारधी वस्तीवर विजय सावता काळे यांचा नऊ जणांनी निर्घुण खुन केला होता. यापैकी दोन संशयीतांना कोरेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले परंतु, मुख्य सुत्रधारासह इतर संशयीत पसार झाले होते. दि. 20 रोजी आसगाव, ता. सातारा येथील टेकडीवर एलसीबीच्या पथकाने मुख्य संशयीताचा थरारक पाठलाग करून त्यास जेरबंद केले.
जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 337 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत, तर 11 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी शिक्षण सुरु राहणे आवश्यक आहे. यासाठी ऑनलाईन शिक्षणामध्ये पालकांना येणार्या अडचणींचा विचार करून विद्यार्थ्यांना वापरता येईल असे सहज सोपे अॅप्लिकेशन उपलब्ध करून देणेत आले आहे त्याचा सर्वांनी मुलांच्या शिक्षणासाठी वापर करावा यासाठी विजयनगर गावाचे मार्गदर्शक माजी आमदार आनंदराव पाटील व बाजार समितीचे संचालक सुनिल पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम शाळेत घेणेत आला.
सातारा जिल्ह्यात कोरोनाची संख्या 9 हजारांहून अधिक झाली आहे. गुरुवारी दिवसभरात कोरोनाचे 337 रुग्ण आढळले आहेत.