माण तालुक्यातील पळशी गाव हे शेतीच्या बाबतीत सधन समजले जाते. गेल्या दोन महिन्यांपासून या परिसरात दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले. या पावसाच्या जोरावर शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणावर खरीप पिकांची लागवड केली आहे.
विघ्नहर्ता बाप्पांचे आगमन अवघ्या दोन दिवसांवर आल्याने बाजारपेठेत श्रींच्या समोर सजावटीसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे. कोरोना संकटातही भाविकांची उत्साहात खरेदी सुरू होती.
‘सर्व गणेशोत्सव मंडळांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, सामाजिक जाणिवेतून आदर्श निर्माण करत ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना राबवावी. कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई केली जाणार व शासनाच्या नियमांचे पालन करून गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा,’ असे आवाहन वाठार पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील घोंगडे यांनी केले.
जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 396 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 8 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्याने गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला विसर्ग बंद करण्यात आला असून कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे पूर्णतः बंद करण्यात आले आहेत. सध्या पायथा वीजगृहातूनच 2100 क्युसेक विसर्ग सूरू आहे. धरणात सध्या 91.63 टीएमसी पाणीसाठा आहे.
सातारा जिल्ह्यात संसर्ग वेगाने फैलावत असल्याने रुग्णसंख्या दहा हजारांच्या दिशेने वेगाने सरकू लागली आहे. बुधवारी आणखी 396 नव्या बाधितांची भर पडली असून 9 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
मत्त्यापूर (ता. सातारा) येथून दोन लाख रूपयांचे सोन्याचे दागिने चोरणार्या तीन चोरट्यांना बोरगाव पोलिसांनी अटक केली. त्यात दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.
सध्या सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे येथील पुष्कर तलाव सुमारे 70 टक्के भरला आहे. तलावात साठलेल्या पाण्यामुळे शिंगणापूर गावासह पंचक्रोशीतील शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण आहे. तसेच दुष्काळवर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शासनाच्या मदतीने 2014 पासून ग्रामपंचायतीने केलेल्या जलसंधारणाच्या कामाची पोचपावती मिळाल्याचेही गावकरी सांगत आहेत.
सातारा : वाढीव निधी मिळत नसल्याने सातारकरांचा कास धरणाच्रा उंची वाढवण्याच्या कामाला ब्रेक लागला होता. मात्र, ज्या ना. अजित पवारांनी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मागणीवरून प्रकल्पाला मंजुरी दिली होती त्याच ना. पवारांनी आज पुन्हा आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्याच मागणीवरून कास धरण प्रकल्पासाठी वाढीव ५७ कोटी निधी देण्यासाठी मान्यता दिली. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनु...
गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसाने खटाव तालुक्याच्या 60 टक्के भागाला वरदान ठरलेल्या नेर तलावातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. तीन दिवसांमध्ये तब्बल पाणीसाठ्यात सात फूट वाढ झाली आहे. परिणामी नेर, पुसेगाव, खटाव, भुरकवडी, कुरोली सिद्धेश्वरसह येरळवाडी पर्यंतच्या शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.