मोक्कातील आरोपींना न्यायालयाकडून जामीन मिळणे ही अत्यंत धोकादायक बाब असून भविष्यात अशा घटना टाळायच्या असतील तर पोलीस यंत्रणेतील वरिष्ठ अधिकारी, सरकारी वकील यांची याप्रकरणी चौकशी करण्यासाठी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी अशी मागणी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत केली.
येथील सानिका टूल्स कंपनीच्या सल्लागार संचालकपदी दैनिक ऐक्यचे प्रतिनिधी शशिकांत कणसे यांची आज नियुक्ती करण्यात आली असून कंपनीचे अध्यक्ष जितेंद्र शिंदे यांनी त्यांना आज तसे नियुक्तीपत्र प्रदान केले.
'शिवसेनाप्रमुखांना दिलेला शब्दच पाळायचा होता तर सुभाष देसाई, दिवाकर रावते एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करायचं होतं. मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं तर नारायण राणेंना पक्षातून का बाहेर जावं लागलं? राणेंना तर पक्षप्रमुख व्हायचं नव्हतं. राज ठाकरेंना पक्षातून बाहेर का जावं लागलं?' असा सवाल करतानाच 'उद्धव ठाकरेंनी भाबडेपणाचा मुखवटा उतरवला पाहिजे', अशा शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे.
मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ बऱ्याच काळानंतर धडाडली. दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावरून ठाकरी शैलीत त्यांनी जुना मित्रपक्ष भाजप आणि केंद्र सरकारवर टीकेचे बाण सोडले. जवळपास तासभर उद्धव ठाकरे यांनी भाषण केले. यात हिंदुत्व, ड्रग्ज प्रकरण, लखीमपूर खेरी हिंसाचार या महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घालत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली.
सातारा नगरपालिकेचे निवडणुकीचे वातावरण तापू लागल्यामुळे आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. खा. उदयनराजे भोसले यांनी केलेल्या आरोपावर आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी होत आहे. ही बाब सकारात्मक असून कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला गती दिली पाहिजे. यासाठी गाव निहाय व शहरी भागात वॉर्डनिहाय यादी तयार करुन वॉर्ड समित्या कार्यान्वीत करा. यामध्ये लोकप्रतिनिधींचा मोठ्या प्रमाणात सहभाग घ्या, असे निर्देश सहकार व पणन तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले.
खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दोन दिवसांपूर्वी साताऱ्यात दुचाकीवरून जाऊन विकास कामांचे उद्घाटन केले होते. त्यावर आमदार शिवेंद्रराजे यांनी टोला लगावत नगरपालिका नीट चालवली असती तर दुचाकी चालवायची वेळ आली नसती, असे म्हंटले होते. यावर उदयनराजे यांनी आज किल्ले प्रतापगड येथे त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले.
पडळ, ता. खटाव येथील माळरानावर माजी आमदार व जिल्हा बँकेचे संचालक प्रभाकर घार्गे यांनी तीन वर्षांपूर्वी उभा केलेला. खटाव-माण ऍग्रो प्रोसेसिंग लिमिटेड या साखर कारखान्यामुळे शेती, पाणी व सिंचनाचा प्रश्न प्राधान्याने लक्ष मार्गी लावला. खटावसह माण तालुक्यातील शेती व्यवसायात क्रांती निर्माण झाली आहे. परिसरातील युवकांना रोजगार उपलब्ध झालाच आहे. शिवाय कारखाना परिसरामध्ये रस्त्यांचे जाळे निर्माण झाल्यामुळे वाहतूक व दळणवळण प्रश्न मार्गी लागला आहे.
येथील मंगळवार पेठेतील शुभांगी गणेश खांडेकर (वय 26)हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. शुभांगीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून शाहूपुरी पोलीस ठाण्यात पतीसह सासूवर गुन्हा दाखल झाला आहे.
येथील बुधवार पेठेतील विजय विनोद कांबळे (वय 26) या युवकाच्या डोक्यात कोयता मारून त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून शहर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.