येथील नगरपालिकेचा ई-कचरा विघटनासाठी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार पालिकेने शहरातील संपूर्ण ई-कचऱ्याचे विघटन करण्यासाठी महालक्ष्मी ई-रिसायकल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसोबत 5 वर्षाचा करारही केला आहे. नुकताच कराड नगरपालिका आणि महालक्ष्मी ई-रिसायकल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये हा करार करण्यात आला.
शासनाकडून वंचित घटकांसह अल्प भू धारक शेतकरी, शेतमजूर, भूमीहीन आदी घटकांसाठी विविध योजना जाहीर केल्या जातात. मात्र, अनेकवेळा त्या लोकांना माहिती नसल्याने त्यांच्या पर्यंत पोहोचतही नाहीत.
दुबईस्थित अल अदील समूहाचे संचालक हृषिकेश दातार पुण्याचे जावई बनले आहेत. हृषिकेश हे अल अदील समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांचे ज्येष्ठ सुपुत्र असून त्यांची लग्नगाठ पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक-व्यावसायिक समीर लडकत यांची कन्या आकांक्षा हिच्याशी जुळली आहे.
येत्या 3 जानेवारी 2022 पासून 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. ही लस सर्व प्राथामिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय या ठिकाणी दर सोमवार व शुक्रवार या दोन्ही वारी लसीकरण होणार आहे. या लसीकरणाचा जास्तीत जास्त युवक-युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
येथील विजय दिवस चौकात ऊसाने भरलेला ट्रक पलटी झाला. ट्रकचा एक्सल तुटल्याने ही घटना घडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीविन हानी झाली नसून ट्रकचालक या अपघातातून सुखरूप बचावला आहे. दरम्यान, या घटनेने काही काळ शहरातील वाहतुकीवर परिणाम झाल्याचे दिसून आले.
रेठरे बुद्रुक ता. कराड येथे वसुलीसाठी गेलेल्या वीज कर्मचाऱ्याला तिघांनी मारहाण केली. सोमवारी 27 रोजी ही घटना घडली. याप्रकरणी तिघांवर कराड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सहा जणांविरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.
मद्यप्राशन करून अपघातात जखमी केल्याप्रकरणी कार चालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
वेचले, ता. सातारा गावच्या हद्दीत वन विभागाने कारवाई करत विनापास, विनापरवाना सागवान, रायवळ लाकडांची वाहतुक करून ठेवण्यात आलेला ट्रॅक्टर- ट्रॉली ताब्यात घेतली. या कारवाईत लाकडांसह ट्रॅक्टर-ट्रॉली असा 10 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून सरत्या वर्षातील वनविभागाची आत्तापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे.
हरिहरेश्वर बँकेच्या दीड हजार खातेदारांची तब्बल चाळीस कोटीची फसवणूक विद्यमान संचालकांनी केली आहे. 29 पैकी केवळ 5 संचालकांना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे, मात्र आरोपी समोर असूनही पोलीस मात्र अटकेची कारवाई करत नाही. या संपूर्ण घोटाळ्याचा प्रवर्तन संचालनालय अथवा केंद्रीय गुन्हे अन्वेषण मार्फत करण्यात यावा, अशी मागणी हरिहरेश्वर बॅक खातेदार कृती समिती च्या वतीने पत्रकार परिषदेत केली.