सातारा तालुक्यातील खिंडवाडी येथील सिव्हील कॉलनी परिसरात जावयाला मारहाण केल्याप्रकरणी सासूसह तिघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यशोदा घाडगे, जीवन घाडगे, सुप्रिया घाडगे अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नव्हती.
मलकापूर नगरपालिकेच्या क्लार्कने शिपायास दारूच्या नशेत शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच शासकीय कर्मचार्याला त्याच्या कर्तव्यामधून रोखल्याप्रकरणी कराड येथील जिल्हा सत्र न्यायाधीश रविकांत टी. साखरे यांनी एकास सहा महिने कैद व 12 हजार रूपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचे आदेश दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करून रस्त्यावर वाढदिवस साजरा करणाऱ्या दहा ते बारा जणांवर कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी 9 रोजी रात्री शहर पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली.
फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन एका महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी अमोल विजय मराठे, वय २७, रा. पसरणी, ता. वाई याच्या विरोधात पोलीस पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.
नगरपालिकेला चुना लावणाऱ्यासह तब्बल दहा हजार थकबाकीदारांना वसूली व कारवाईची नोटीस पाठविण्याच्या हालचाली वसूली विभागात सुरू झाल्या आहेत. येत्या काही दिवसांतच या नोटीसा धाडल्या जाणार असून, कारवाई टाळण्यासाठी थकबाकी जमा करावी, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून टनामागे 10 रुपये कपात करून तो निधी गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाला देण्याचा जीआर राज्य शासनाने काढला आहे. परंतु, राज्यात अण्णाभाऊ साठे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सारथी व आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाला सरकार पैसे देते. मग ऊसतोड महामंडळाला शेतकऱ्यांनी का पैसे द्यावेत? हा प्रश्न आहे.
वाढत्या कोरोनाच्या रुग्ण संख्येमुळे महाराष्ट्रात ११ अकरा ते सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास संचारबंदी लागू करण्यात आली असून त्याची अंमलबजावणी रविवारी रात्रीपासून सातारा शहरात अत्यंत कडकपणे करण्यात आली.
ओमायक्रॅानच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा प्रशासनाने नवी नियमावली जाहीर केली असून जिल्ह्यातील पर्यटन स्थळे बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाबळेश्वरमधील सर्व टुरिस्ट पाॅईंट बंद करण्यात आले असून अम्युजमेंट पार्क, वेण्णा लेक बोटिंग पाॅईंट सुद्धा बंद करण्यात आले आहेत. लाॅजिंग मात्र 100 टक्के क्षमतेने सुरू राहणार असून रेस्टाॅरंट 50 टक्के क्षमतेने सुरू असल्याची माहिती महाबळेश्वर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी दिली आहे.
दुष्काळी भागात नैसर्गिक वरदान लाभलेल्या येरळवाडी धरण परिसरात परदेशी पक्ष्यांच्या आगमनाने पर्यटक व अभ्यासकांची वाढ झाली आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यास वाव असला तरी स्थानिक वन विभागाचा दुर्लक्षितपणा व अभाव यामुळे खटाव तालुक्यातील वन विभागाच संशयाच्या पिंजऱ्यात अडकला आहे.त्याची वरिष्ठ पातळीवर चौकशी करावी अशी मागणी येरळवाडी सह खटाव तालुक्यातील वृक्षप्रेमींनी केली आहे.
सहकार, पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि वित्त व नियोजन राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न झाली.