वाई-मेणवली रस्त्यावर हॉटेल राजयुग जवळून पोलिसांनी पाचजणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून अवैध पिस्तूल जप्त केले आहे. यावेळी सातारा येथील एक तडीपार गुंड पळून जाण्यात यशस्वी ठरला.
खानापूर, ता. वाई येथील दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम व किराणा साहित्य चोरून नेल्याची तक्रार भुईंज पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
हरिहरेश्वर बँक घोटाळ्याची व्याप्ती वाढली असून बनावट कर्ज प्रकरण दाखवून ४ कोटी ४९ लाख रुपयांचा गैरव्यवहार आणखी एक गुन्हा अजित खामकर, नंदकुमार खामकर यांच्यासह १८ जणांवर दाखल झाला आहे.
वाई पाचगणी रस्त्यावर पसरणी घाटात महाडला जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स बसला नागेवाडी फाट्यावर सोळा नंबर बस स्टॉप जवळ आग लागून संपूर्ण बस जळून खाक झाली. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
येथील हरिहरेश्वर सहकारी बँकेच्या ३७ कोटी ४६ लाख रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी बँकेचे संस्थापक नंदकुमार खामकर यांच्यासह २९ जणांवर गुन्हा दाखल असून याप्रकरणात पाच जणांना आज आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन एका महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी अमोल विजय मराठे, वय २७, रा. पसरणी, ता. वाई याच्या विरोधात पोलीस पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.
कुर्ला, मुंबई येथील एका विवाहित महिलेला मुल होण्यासाठी एकाने वाई, जि. सातारा येथील आपल्या बहिणीच्या घरी तसेच यवतमाळ, जि. यवतमाळ येथील चुलत्यांच्या घरी घेऊन जात आयुर्वेदिक औषध देण्याच्या आमिषाने त्या महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून विठ्ठल गणपत पवार याच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.
तीन महिन्याचा पगार, वीस वर्षाचा लाभ, सर्व सातवे वेतन आयोगाचा फरक असे एकूण २ लाख ७७ हजार ६८५ रुपयांचे बिल पारीत केल्याचा मोबदला व पुढील बिल काढण्यासाठी लाचेची मागणी करुन १ हजार रुपयांची लाच स्वतः स्वीकारताना वाई येथील उपकोषागार कार्यालयातील उपकोषागार सुधाकर शंकर कुमावत यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
वाई शहरातील दोन मुले बेपत्ता झाल्यानंतर वाईस सातारा जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती शाळांच्या आवारात मुलांची आणि काळजी घेण्याचे आवाहन वाई च्या पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने देखील केले होते या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क झाले. त्यांनी तांत्रिकदृष्ट्या तपास केला, पण बेपत्ता झालेली ही दोन मुले पैसे संपल्यावर पनवेल मध्ये सापडली.
वाई शहराच्या विकासामध्ये विद्यमान, माजी नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष, नगरसेवक-माजी नगरसेवक, यांनी महत्वाची भूमिका बजावली असून, त्यांचा आज कृतज्ञता गौरव सोहळा वाई नगरपरिषदेने आयोजित केला आहे. ही कोतुकास्पद बाब आहे. त्याचा आदर्श जिल्ह्यातील इतर नगरपरिषदांनी घ्यावा, असे प्रतिपादन सहकार, पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.