बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी देवा मन्नाराम सोलंकी (रा.संगमनगर) याच्याविरुध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, संशयित आरोपी याने मारहाण केली असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
कराड : बहिणीला त्रास देत असल्याच्या रागातून मेव्हण्यानेच त्याच्या दाजीचा खून केल्याची धक्कादायक घटना येथील वाखाण परिसरात घडली आहे.गुरुवारी 28 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास मजूरीचे काम करत असलेल्या दाजीचा त्याच्याच मेव्हण्याने गळा दाबून व छाती दगडाने ठेचून खून केला आहे. घटनेची नोंद शहर पोलीस ठाण्यात झाली असून याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.नितीन नागेश भालशंकर (वय 21) रा....
पालिकेत काम करत असताना कर्तव्यावर, तसेच इतर कामांदरम्यान मृत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरीत सामावून घेण्याची कार्यवाही १९९७ पासून झालेली नाही. ही प्रक्रिया पूर्ण न झाल्याने अनेक मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना वयो मर्यादेचा सामना करावा लागत आहे.
ग्रंथालय व वाचनालयात ज्या नागरिकांनी कोविड-19 च्या लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत, अशाच नागरिकांना प्रवेश देण्यात यावा. ग्रंथालयामध्ये सामाईक क्षेत्रांमध्ये आणि प्रतीक्षा क्षेत्रांमध्ये कायमस्वरुपी किमान सहा फूट इतके पर्याप्त सुरक्षित अंतर राखावे. ग्रंथालयामध्ये सर्व नागरिकांनी तोंडाला मुखपट्टी (मास्क) बांधणे बंधनकारक आहे.
राज्यातील नगरपालिका आणि महापालिकांच्या नगरसेवकांच्या संख्येत वाढ करण्याचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर झाला आहे. सातारा जिल्ह्यातील आठ नगरपालिकांमध्ये २५ नगरसेवक वाढणार आहेत. शासनाच्या या निर्णयाने वॉर्ड आरक्षण आणि वॉर्ड रचना यांच्यात फेरबदल होऊन मतदारसंख्या मात्र निश्चित विभागली जाणार आहे.
छत्रपती शिवाजी संग्रहालयाचे काम अद्यापही अर्धवट अवस्थेत असून विविध दालनांच्या अद्ययावतीकरणाचे काम अद्यापही अर्धवट अवस्थेत आहे. या कामाचा तब्बल सव्वातीन कोटी रूपयांचा निधी प्रलंबित आहे. सातारा एसटी आगारासमोरील छत्रपती शिवाजी संग्रहालयाची जुनी इमारत मोडकळीस आली असून येथे पुरातत्व विभागाच्या ऐतिहासिक वस्तूंचे मोठे दालनं आहे.
शिवरायांच्या ऐतिहासिक कार्याचा मानबिंदू असलेली घटना असून बुधवार दि. 10 रोजी प्रतापगडावर भारतीय रक्षक आघाडीतर्फे कृष्णा भास्कर कुलकर्णी व अफझल खान वध दिन साजरा करण्यात येणार असल्याची माहिती आघाडीचे संस्थापक टेक्सास गायकवाड यांनी दिली.
‘मताधिकार हा प्रत्येक नागरिकाचा कायदेशीर अधिकार आहे’, ‘प्रत्येक मत अमूल्य आहे’, अशा प्रकारची वाक्यं आपण अनेकदा वाचतो. आपण सामान्य परिस्थितीत राहत असू तर कदाचित संविधानाने देऊ केलेल्या या अधिकाराचं मूल्य, आणि या वाक्यांचं सत्त्व आपल्याला जाणवेलच असे नाही. पण ज्यांच्या पुढे रोजच्या जगण्याविषयी अनंत प्रश्न आहेत, अशा समाज घटकांसाठी हा अधिकार मिळवणे किंवा प्राप्त होणे, ही तुम्हा-आम्हांला वाटते तितकी सोपी बाब नसते.
सामाजिक जाणिवेमधुन, सातारच्या सैनिक बँकेच्या माध्यमातुन भिमाबाई आंबेडकर चौकात उभारण्यात येणारे कर्नल आर.डी.निकम ट्रॅफिक आयलॅन्ड व त्या अनुषंगाने करण्यात येणारे सुशोभिकरण निश्चितच आदर्श व शहराचे सौंदर्यवृध्दी करणारे ठरेल, असे मत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.
गाळपास येणाऱ्या उसाचे पेमेंट शेतकऱ्यांना वेळच्या वेळी देणारा कारखाना म्हणून अजिंक्यतारा साखर कारखान्याचा नावलौकिक आहे. राज्यातच नव्हे तर देशात अजिंक्यतारा कारखान्याने एक आदर्श निर्माण केलेला आहे. कारखाना पूर्णपणे आर्थिक सक्षम असून शेतकऱ्यांना आणखी चांगला ऊसदर देता यावा यासाठी उपपदार्थ निर्मीतीवर जास्त भर दिला जाणार आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.