सातारा शहर परिसरातून दुचाकीची चोरी झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री असताना ज्यांनी मातोश्री चा उंबरठा ओलांडला नाही ते उध्दव ठाकरे आता सत्ता गेल्यावर बांधावर जाण्याची नाटके करीत आहेत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना संकट काळातील शेतकऱ्यांना किती मदत केली याचा हिशोब द्यावा अशी सणसणीत टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
सातारा जिल्हा रुग्णालयांमध्ये तात्काळ अतिदक्षता विभागातील उपचार न मिळाल्यामुळे बसप्पा पेठेतील एका रिक्षा चालकाला जीव गमावण्याची वेळ आली या प्रकरणामुळे संबंधितांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करत थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागण्याचा पवित्रा घेतल्याने एकच खळबळ उडाली.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात एजंटांकडून करण्यात आलेले अतिक्रमण मंगळवारी पालिकेच्या पथकाकडून काढण्यात आले. तीन एजंटांकडून फुटपाथवर उभारण्यात आलेले छत काढून फुटपाथ मोकळा करण्यात आला.
मंदिरातील दोन मुकुट आणि रोख रकमेची चोरी केल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी पाच जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी तिघांवर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सांगली जिल्ह्यातील सलगरे गावचा मूळ राहिवासी व नोकरीनिमित्ताने पुण्यात कार्यरत असलेल्या मोहन महादेव हारगे या प्राथमिक शिक्षकाने आर्थिक फसवणूक केल्याचा तसेच मुलीसह आपले अपहरण केल्याचा आरोप करून कराड तालुक्यातील शुभांगी शेळके या दिव्यांग महिलेने या प्रश्न न्याय मिळावा, म्हणून साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले आहे.
नागेवाडी आणि लिंब या दोन ग्रामपंचायतीच्या हद्दीवर असणाऱ्या यशराज इथेनॉल या कंपनीमुळे गावातील जलस्त्रोतांचे प्रदूषण झाले आहे. तसेच कंपनीच्या हवेतील प्रदूषणामुळे येथील विषयुक्त अन्न सेवन करावे लागत असून जमीनही नापीक झाली आहे.
वडूज ता खटाव येथील सामान्य शेतकरी भिमराव मारुती गोडसे यांना एका जंगली वानराने कमरेला धारदार नखे लावून गंभीर जखमी केले. यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाच्या दुर्लक्षित पणामुळे सणासुदीला शेतकरी वर्ग भयभीत झाला आहे.