‘केळघर परिसरात कोरोना बाधितांचे प्रमाण वाढू लागले आहे. कोरोनाची साखळी खंडित होण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. प्रशासनास ग्रामस्थांची साथ मिळाल्यास कोरोना हद्दपार होण्यास फारसा अवधी लागणार नाही. केळघर परिसरात कोरोनामुक्तीसाठी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले विचारमंच सामाजिक बांधिलकीतून प्रयत्न करत आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनारूपी संकटावर मात करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे,’ असे आवाहन प्रांताधिकारी सोपान टोम्पे यांनी केले.
‘येथे कोरोना बाधितांचा आकडा वाढत असताना कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थ प्रयत्न करणार आहेत. गाव कोरोनामुक्त होऊन पूर्वपदावर येण्यासाठी गावातील सर्व ग्रामस्थांनी प्रशासनाने घालून दिलेल्या निर्बंधांचे पालन करावे,’ असे आवाहन सरपंच रवींद्र सल्लक यांनी केले.
मेढा-केळघर भागातील कण्हेर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील गावांची पाण्याअभावी दैना झाली असून, 1991 पासूनच्या तीन दशकात या भागातून मोठ्या प्रमाणावर शहरात स्थलांतर होत आहे. बर्याच प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद पडल्या असून, केडंबे येथील हायस्कूल सुद्धा बंद पडले आहे. 60 ते 70 टक्क्यांच्यावर शेती पाणी नसल्यामुळे पडून आहे. जावली तालुका दूध पुरवठा संघ 10 वर्षांपूर्वीच बंद पडला असून, भागातील दुग्धव्यवसाय पूर्णपणे संपलाय. पाण्याअभावी कुठलाच जोडधंदा करणे शक्य नाही. त्यामुळे तरुण वर्ग शहरात स्थलांतरित
जावळी तालुक्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढू लागला असल्याने चिंता व्यक्त होत आहे. अशातच जावळी तालुक्यातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी लवकरच तालुक्याचे मुख्यालय असलेल्या मेढा येथे सर्व सोयींनियुक्त ऑक्सिजनसह 30 बेडचे सुसज्ज कोविड रुग्णालय उभारण्यात यावे तसेच बामणोली येथेही 10 बेडच्या रुग्णालय उभारणी करावी, असा आदेश राज्याचे नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जावळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांना दिल
मेढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया काल पार पडली. या प्रक्रियेत राष्ट्रवादी चिन्हावर निवडून आलेले पांडुरंग जवळ यांची नगराध्यक्षपदी तर कल्पना जवळ यांची उपनगराध्यक्षपदी निवड बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सोपान टोंपे यांनी केली. निवडणूक प्रक्रियेसाठी त्यांना तहसीलदार राजेंद्र पोळ व मुख्याधिकारी अमोल पवार यांनी सहकार्य केले.
‘मेढा ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळवून देण्याबरोबरच या नगरीचे सर्वप्रकारचे प्रश्न ज्या-त्या वेळी सोडवले आहेत. सातारा-महाबळेश्वर रस्त्यावरील प्रमुख शहर असलेल्या मेढा नगरीचा कायापालट करण्यासाठी यापुढेही प्रयत्न करणार असून, या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कुठेही कमी पडणार नाही, असा शब्द आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला.
काटवली (ता. जावली) दापवडी येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र नुकतेच सुरू करण्यात आले आहे. या उपकेंद्राला इमारतीसाठी निधी उपलब्ध व्हावा व या उपकेंद्रात आरोग्य अधिकार्याची नेमणूक करावी,अशी मागणी काटवली व दापवडी ग्रामस्थांनी आज जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
विटा-महाबळेश्वर राज्यमार्गाचे केळघर बाजारपेठेत रुंदीकरणाचे काम धिम्या गतीने सुरू असून, पावसाळ्यापूर्वी रुंदीकरणाचे काम मार्गी न लागल्यास आंदोलनाचा इशारा सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय बेलोशे यांनी दिला आहे.
‘सातारा जिल्ह्यामध्ये आरोग्य यंत्रणेमध्ये सध्या मनुष्यबळ खूप कमी आहे. त्यामुळे पूर्ण क्षमतेने आरोग्य विभागास काम करण्यास अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे. त्यापेक्षा नागरिकांनीच स्वतःची काळजी घ्यावी, हाच कोरोनावर एकमेव उपचार,’ असा सल्ला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी दिला आहे.
‘कोरोना काळात महसूल विभागाच्या कर्मचारी व अधिकार्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. केळघर येथे मंडलाधिकारी म्हणून काम करत असताना प्रशासकीय कामाबरोबरच कोरोना काळात राबविण्यात आलेल्या योजनांमध्ये मंडलाधिकारी ए. ए. मेमन यांचा सहभाग कौतुकास्पद होता. त्यांचा आदर्श महसूल विभागातील कर्मचार्यांनी घ्यावा,’ असे आवाहन प्रांताधिकारी सोपान टोम्पे यांनी केले.