जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, निझरे येथे घणसोली बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून शाळेतील सर्व मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
पुणे येथे विभागीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली रेल्वेच्या विविध प्रश्नांच्या संदर्भामध्ये आढावा बैठक संपन्न झाली.
जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात 129 बाधितांची नोंद झाली असून, एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर 38 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
या विभागातील अनेक गावांतील पाळीव प्राण्यांवर बिबटयाने हल्ले करुन त्यांना ठार केल्याचे प्रकार सतत घडत आहेत. यापूर्वी बिबटयाचा वावर होता परंतू पुरावा नव्हता. रात्री बिबटयाला पळवून लावताना त्याचे मोबाईलवरुन फोटो काढण्यात यश मिळाले. - संजय पाळेकर, प्रत्यक्षदर्शी
उंबर्डे (ता. खटाव) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुनंदा संजय पवार तर उपसरपंचपदी संभाजी शिवाजी पवार यांची बहुमताने निवड झाली. सरपंच, उपसरपंच निवडीवेळी नाट्यमयरीत्या घडामोडी घडल्या. बहुमतातील आघाडीची दोन मते फुटल्याने अल्प मतातील आघाडी बहुमतात आली.
सातारा जिल्ह्यातील कोरोना विषाणू संशयित अथवा संक्रमिक रुग्ण संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी लग्न समारंभाबाबत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सुधारित आदेश जारी केले आहेत.
‘महाराष्ट्र साहित्य परिषद नेहमीच मराठी भाषा, साहित्य व संस्कृती याचे संवर्धन करण्यासाठी अनेक उपक्रम राबवत आहे, त्याला सर्व मराठी माणसांनी मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला पाहिजे,’ अशी अपेक्षा महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सातारा जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकिहाळ यांनी व्यक्त केली.
भारतीय अॅथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने रायपूर (छत्तीसगड) येथे नुकत्याच पार पडलेल्या 32 व्या वेस्ट झोन कनिष्ठ गट मैदानी स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघातून खेळणार्या मोहीत संतोष जगताप याने 2000 मिटर धावणे प्रकारात 6.4 मिनिटांची विक्रमी वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले.
महामार्ग पोलीस केंद्र, भुईंज मार्फत महाराष्ट्र राज्याचे वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या संकल्पनेतून व पोलीस अधीक्षक संजय जाधव, पोलीस उपअधीक्षक प्रीतम यावलकर, पोलीस निरीक्षक राजन सस्ते महामार्ग पोलीस विभाग पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘हायवे मृत्युंजय दूत अभियान’ राबवण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ महामार्ग पोलीस केंद्र, भुईंज यांच्या मार्फत जोशीविहीर (ता. वाई) येथील साईविश्व मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात करण्यात आला.
दातेवाडी (ता. खटाव) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी गौरी नीलेश पवार तर उपसरपंचपदी रंजना काशिनाथ जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.